शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

रेल्वे पुलावर दुभाजक बसविण्याची मागणी हिंगोली: शहरातील वाशिमरोडवर असलेल्या रेल्वे पुलावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणावरुन ...

रेल्वे पुलावर दुभाजक बसविण्याची मागणी

हिंगोली: शहरातील वाशिमरोडवर असलेल्या रेल्वे पुलावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणावरुन वाहने वेगाने चालविली जात आहेत. वाहनांची संख्या लक्षात घेता संबंधित विभागाने या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसवून अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कायमस्वरुपी पोलीस नेमावा

हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक हा भाग अत्यंत वर्दळीचा आहे. वाहनांची संख्याही या ठिकाणी वाढली आहे. परंतु, काही वाहनचालक वाहने अस्ताव्यस्तपणे लावत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजार करण्यासाठी येतात. तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेऊन कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे

हिंगोली: रब्बी हंगामातील भाजीपाला पीक वाढीच्या अवस्थेत आहे. रब्बी हंगामात लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे. कांदा पिकात करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायफेन्कोनॅझोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरातील अनेक गावांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विहिरींना पाणी असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे

बसस्थानकात धुळीचे प्रमाण वाढले

हिंगोली: मागील काही दिवसांपासून बसस्थानकात धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. महामंडळाच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन सकाळ-सायंकाळ बसस्थानकात पाणी टाकून धूळ कमी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

शहरात वानरांची संख्या वाढली

हिंगोली: गत काही दिवसांपासून अन्न व पाण्याच्या शोधात वानरे शहरात दाखल झाले आहेत. घरावरील कौलावरुन उड्या मारत अंगणात ठेवलेल्या वस्तुंची नासाडी करीत आहेत. नागरिकांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येत आहेत. वन विभागाने सापळा रचून वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.