शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Maharashtra Election 2019 : आधी माघार कोण घेणार? युतीतील बंडखोरीचे त्रांगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 11:38 AM

आज दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत

ठळक मुद्देरविवारी दिवसभर खल

औरंगाबाद : जिल्ह्यात फुलंब्री आणि गंगापूर वगळता शिवसेना-भाजप उमेदवारांच्या विरोधात नाराज झालेल्या बंडखोरांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यातील किती बंडखोर माघार घेणार हे सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होईल; परंतु रविवारी दिवसभर बंडखोरांच्या मागे उमेदवारांचे ‘दूत’ धावत होते.

युतीतील बंडखोरांपैकी माघार कोणत्या पक्षाच्या बंडखोराने आधी घ्यावी, यावरून दिवसभर खल झाला. रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय न झाल्यामुळे सोमवारी पुन्हा उमेदवारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बंडखोरांची खुशामत करावी लागेल. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून झालेली बंडखोरी थोपविण्यात यश आल्याची चर्चा रविवारी होती; परंतु जोपर्यंत अर्ज मागे घेण्यात येत नाही, तोपर्यंत काहीही होऊ शकते. 

पैठण आणि गंगापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे, तर सिल्लोड मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शिवाय प्रचारातूनही अंग काढून घेतले आहे. त्यामुळे तेथे शिवेसना उमेदवाराची कोंडी झाली आहे. 

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात शिवसेनेचे राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब गायकवाड, राजू शिंदे यांनी शिवसेना उमेदवार आ. संजय शिरसाट यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. 

औरंगाबाद मध्य मतदारसंघात भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी शिवसेना आ. प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. 

वैजापूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या विरोधात भाजपचे एकनाथ जाधव, दिनेश परदेशी यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला       आहे. 

कन्नड मतदारसंघात भाजपचे संजय गव्हाणे यांनी शिवसेना उमेदवार उदय राजपूत यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. 

उमेदवार होते चिंतितबंडखोरांना थोपविण्यात दिवसभर यश आले नाही. मात्र, रात्री उशिरानंतर काही पर्यायांवर चर्चा करून बंडखोरांना थोपविण्यासाठी उमेदवारांनी तयारी केली होती. दिवसभर युतीचे उमेदवार चिंतित दिसत होते. बंडखोर माघार घेतील, असा दावा युतीतील उमेदवारांनी केला. पक्षप्रमुख, प्रदेशाध्यक्षांकडून आदेश आल्यानंतर किंवा एखादे लाभाचे पद देण्याच्या आश्वासनावर बंडखोर माघार घेतील, असा विश्वास उमेदवारांना आहे. 

दरम्यान, वैद्य, तनवाणी, शिंदे, गायकवाड, परदेशी यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत रविवारी काही निर्णय घेतला नाही. तनवाणी दिवसभर समर्थकांच्या बैठकीत होते. शिंदे यांना फुलंब्रीतून माघार घेण्यासाठी बोलावणे आले होते. दरम्यान, रमेश गायकवाड यांच्या अर्जाबाबत न्यायालयात काय सुनावणी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गायकवाड हे रविवारी दिवसभर भाजपमधील एका बंडखोर नातेवाईकाच्या संपर्कात होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस