शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून स्वारातीम विद्यापीठाच्या पदवी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST

आखाडा बाळापूर : हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये उघडण्यास परवानगी नसली तरीही ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या ...

आखाडा बाळापूर : हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये उघडण्यास परवानगी नसली तरीही ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या विद्यापीठीय परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकानुसारच होणार आहेत. कुलगुरूंनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा घेण्यास सहमती दर्शविली असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी कळविली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम.,बी.एस्सी. या वर्गाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा ८ मार्चपासून सुरू होत आहेत. या परीक्षा १५ तारखेपर्यंत चालणार आहेत. दरम्यानच्या काळात हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांनी १ ते ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू केली होती. ७ मार्च रोजी पुन्हा नवीन नियमावली जाहीर केली. त्यात शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या परीक्षांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. सर्व महाविद्यालये व परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाशी संवाद साधून याबाबतच्या अडचणी सांगितल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संवाद साधून नव्याने जारी केलेल्या नियमावली बाबत व परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित महाविद्यालये व वर्ग सुरू करण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. मात्र परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचा संदेश परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविला असून, हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये नियमित वेळापत्रकानुसारच परीक्षा आयोजित कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आज जारी केलेल्या नवीन आदेशामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करून नियमित वेळापत्रकानुसार पदवीच्या परीक्षा पार पडणार आहेत. सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षार्थींना याबाबत व्हॉट्सॲप संदेश करून परीक्षेच्या वेळापत्रकात कुठलाही बदल नसून नियमित वेळेत परीक्षा सुरू होईल, असे संदेश पाठवले आहेत.