शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने दुसऱ्या राज्यांमध्ये जाताय का? आधी कोरोनाची टेस्ट करुन घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली: महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जायचे झाल्यास कोरोना चाचणी आवश्यक असून तसे केंद्राने कळविले आहे. परंतु, काही प्रवासी अजूनही कोरोना ...

हिंगोली: महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जायचे झाल्यास कोरोना चाचणी आवश्यक असून तसे केंद्राने कळविले आहे. परंतु, काही प्रवासी अजूनही कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे. कोरोना तपासणीबाबत रेल्वे विभाग प्रवाशांना विचारणा करीत असल्याचे सांगण्यात आले.

गत महिनाभरापासून रेल्वेची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिसरी लाट समोर असून प्रवाशांना मास्क घालण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत, परंतु काही प्रवासी मास्क न घालताच प्रवास करीत असल्याचे समोर येत आहे. जे प्रवासी प्रवासादरम्यान मास्क घालणार नाहीत, त्या प्रवाशांना रेल्वेने नियुक्त केलेले पथक दंडही लावत आहेत. महाराष्ट्रातून इतर राज्यात जायचे झाल्यास कोरोना महामारीची तपासणी करणे अनिवार्य आहे, असे केंद्राने कळविले आहे. तिकीट काढतेवेळेस रेल्वे विभागही कोरोना तपासणी केली आहे का? याची विचारणा करीत आहे.

सध्या सुरु असलेल्या रेल्वे

नांदेड ते अमृतसर

नांदेड ते गंगानगर,

अमरावती ते तिरुपती

नरखेड ते काचीगुडा

या रेल्वे कधी सुरु होणार ?

अमरावती ते पुणे, अजनी कुर्ला

पॅसेंजर रेल्वेबाबत अजून काही सूचना आलेली नाही. रेल्वे विभागाची सूचना आल्यास प्रवाशांसाठी पॅसेंजर सुरु केली जाणार आहे.

कोरोना टेस्टबाबत विचारणा केली जात आहे

महाराष्ट्रातून इतर राज्यात साधे तिकीट किंवा आरक्षण तिकीट काढून कोणी जात असेल तर त्या प्रवाशांना तिकीट काढतेवेळेस ‘कोरोना तपासणी केली आहे का? तपासणी प्रमाणपत्र आहे का? याची विचारणा केली जात आहे, असे रेल्वे विभागाने सांगितले.

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेला आरक्षण मिळू लागले

कोरोना महामारीचे रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढू लागली आहे. मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे पाहून प्रवाशांनी मोठ्या शहरात जाणे बंद केले होते. कोरोनाची तिसरी लाट समोर ठेवून प्रवाशांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्यातरी प्रवाशांना आरक्षणही मिळू लागले आहे.

कोरोना कमी झाला असून रुग्णही कमी आढळून येत आहेत. परंतु, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्क घालूनच प्रवास करावा. जे प्रवासी मास्क घालणार नाहीत, त्यांना नियमाप्रमाणे दंडही भरावा लागणार आहे.

- रामसिंग मीना, स्टेशन मास्टर, हिंगोली