शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

नाथजोगी समाजाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:34 AM

मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भटक्या जमातीतील पाच लोकांची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील नाथजोगी समाजबांधवांनी ३ जुलै रोजी प्रशासनास निवेदन दिले.राईनपाडा येथील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील विविध भटक्या जमातीतील समाजबांधव मंगळवारी एकत्र जमले होते. शिष्टमंडळाने खा. राजीव सातव यांची भेट घेऊन राज्यभरात भटक्या समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत व्यथा मांडल्या. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धुळे जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर केले. ५ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर समाजबांधवांतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. भटके विमुक्त नाथजोगी, डवरी, नाथपंथी, गोसावी समाजावर दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने भिक्षा मागून पोट भरणाºया व्यक्तींना ओळखपत्र द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनावर नारायण बाबर, आप्पा शिंदे, आप्पाजी शिंदे सावंगीकर, नाना सोळंके, रामा शिंदे, अंबादास शिंदे, भैरू सोळंके आदींच्या स्वाक्षºया आहेत.शासन दुर्लक्षाचे बळी-सातवराइनपाडा घटनेत पाच जणांचा गेलेला बळी हा शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा परिणाम आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत असताना कोणतीच जागृती नाही. समाजात तेढ निर्माण करणाºया या घटनांना शासनच जबाबदार आहे. यातील मयताच्या कुटुंबांना प्रत्येकी ५0 लाखांची मदत व्हावी, अशी मागणी खा.राजीव सातव यांनी केली. तर विविध प्रथा, परंपरांचे रक्षण करणाºया या समाजाला भविष्यात अशा घटनांना सामोरे जावे लागू नये, अशी व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली