शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश आवाज बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

फळगाड्यामुळे वाहतुकीस अडथळा हिंगोली : शहरातील बसस्थानक ते गांधी चौक दरम्यान काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध फळगाडे लावून फळांची विक्री ...

फळगाड्यामुळे वाहतुकीस अडथळा

हिंगोली : शहरातील बसस्थानक ते गांधी चौक दरम्यान काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध फळगाडे लावून फळांची विक्री केली जात आहे. या फळगाड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. इतर वाहनांना रस्ता काढताना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने दखल घेऊन फळगाडीचालकांना इतरत्र जागा द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतातूर

कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. मागील आठ दिवसांपासून थंडी तसेच ढगाळ वातावरण पडत असल्यामुळे तूर पीक धोक्यात आले आहे. कृषी विभागाने तूर उत्पादक शेतकऱ्यांना पिकावर पडत असलेल्या रोगाबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे

हिंगोली : शहरातील तोफखाना, शास्त्रीनगर, इंदिरानगर आदी भागामध्ये रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले पहायला मिळत आहेत. साचलेला कचरा घंटागाडी घेऊन जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन घंटागाडी या भागामध्ये पाठवावी व कचरा उचलून न्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

डिग्रस फाटा येथे गतिरोधक बसविण्याची मागणी

डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहने वेगाने चालविली जात आहेत. गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. संबंधित विभागाने वाहनांची संख्या लक्षात घेऊन डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

विजेच्या लपंडावाला शेतकरी वैतागले

कळमनुरी: मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने विहीर व तलावांना पाणी भरपूर प्रमाणात आहे. परंतु, वीज खंडित होत असल्यामुळे पाणी पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बंदी असतानाही जड वाहने शहरात

हिंगोली : जड वाहनांना शहरात बंदी असतानाही काही वाहनचालक नियमांचा भंग करीत जड वाहने शहरात घेऊन येत आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन जड वाहनांना शहरात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त

कळमनुरी : कळमनुरी ते आखाडा बाळापूर मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांचे अतोनात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगूनही अद्याप कोणीही लक्ष दिले नाही. वेळीच लक्ष देऊन वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.