शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या रोपांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे इम्युनिटी वाढविणाऱ्या व ऑक्सिजन देणाऱ्या रोपांना ...

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे इम्युनिटी वाढविणाऱ्या व ऑक्सिजन देणाऱ्या रोपांना मागणी वाढली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने, रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऑक्सिजन, इम्युनिटीचे प्रमाण वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न केले जात आहेत. दवाखान्यात होणारी गैरसोय लक्षात घेता, आता प्रत्येक जण कोरोना संसर्ग होणार नाही, याची काळजी घेत आहेत. कोरोना झालाच, तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहावी, ऑक्सिजन लेवल चांगली राहावी, यासाठी फळांचे सेवन करीत आहेत, तसेच इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधा, पुदीना, गुळवेल, आवळा, कांडेवेल, पुत्रजिव्हा, गुंज आदी रोपट्यांसह, ऑक्सिजन देणारे पिंपळ, वड आदी रोपटे खरेदी केले जात आहे.

कोरोना काळात इम्युनिटी वाढविणाऱ्या विविध औषधी वनस्पतींची रोपे खरेदीसाठी नागरिक येत आहेत, तसेच सावली देण्यासह ऑक्सिजन मिळणाऱ्या रोपट्यांनाही मागणी आहे. नागरिक दररोज अशी रोपे खरेदी करण्यासाठी येत आहेत.

- शेख महम्मद पाशा, रोपवाटिका चालक

नगरपालिकेच्या रोपवाटिकेत विविध आयुर्वेदिक वनस्पती औषधी रोपांसह इतर ३० हजार रोपे आहेत. कोरोना काळात इम्युनिटी वाढविणाऱ्या रोपांना नागरिकांची मागणी आहे. आगामी काळात १ लाख रोपे तयार केले जाणार असून, यात वनऔषधी रोपांचा समावेश राहणार आहे.

-डॉ.अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, न.प. हिंगोली

तुळस : तुळशीचे पाने सेवन केल्याने सर्दी, खोकला, ताप, दांतदुखी, श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुप्फुसांचे रोग, हृदयाचे विकार दूर करण्यास मदत होते. पानांचा सुगंध घेतल्यास, श्वसनतंत्रातील जीवाणूंचे संक्रमण कमी होते. तुळशीचे पाने मधासोबत घेतल्यास गळ्यातील कफ दूर होतो.

अश्वगंधा : अश्वगंधाच्या नियमित सेवनाने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. अश्वगंधाच्या सेवनाने मेंदूची कार्यप्रणाली चांगली होते. हृदयसंबंधित समस्येपासून वाचता येते. तणाव कमी होतो. डोळ्यांचे आजार दूर होण्यास मदत होते.

पुदिना: पुदिना नियमित खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. पुदिना सेवनाने डोकेदुखी, दातदुखी, वातविकार आदी आजार बरे होण्यास मदत होते. आम्लपित्तातही याचा चांगला उपयोग होतो.

गुळवेल : गुळवेलाचा काढा घेतल्यास शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला दूर होतो. गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

आवळा : आवळ्याचा रस सेवन केल्यास खोकला, सर्दी, ताप यावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. शरीर निरोगी बनते. रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरणातही आवळा गुणकारी असून, वीर्याचा स्रोत आहे. आवळ्याचा रस सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.