शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

coronavirus : हिंगोली @ १५१; दिवसभरात ५० बाधित रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:13 AM

सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ६२ आहे

हिंगोली : जिल्ह्यात आधी एसआरपीएफच्या जवानांमुळे एकदाच मोठी रुग्णसंख्या वाढली होती. त्यानंतर अशी एकदाच रुग्णवाढ होईल, असे वाटत नसतानाच आज एकाच दिवशी तब्बल ५० जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हिंगोलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. आता एकूण रुग्णसंख्या १५१ वर गेली असून बरे झालेल्यांची संख्या ८९ आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ६२ आहे.

हिंगोलीत शनिवारी सकाळीच ६ जण कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे यापूर्वीच्या १0१ वरून आकडा १0७ वर पोहोचला होता. नव्याने बाधित आढळलेल्यांमध्ये यापूर्वी हट्टा येथे आढळलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातील तिघे होते. तर वसमत येथील दोघे नव्याने पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वीचे दोनजण बरे झाल्यानंतर आता पुन्हा एकदाच दोन जण आढळल्याचे दिसून येत आहे. वसमत तालुक्यातील वापटी येथील सात जणही आधीच उपचार घेत आहेत. याशिवाय औंढा तालुक्यातील देवाळा येथील एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वीच हिंगोली तालुक्यातील भिरडा, औंढ्यातील पोटा शेळके येथील एकजण पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व मुंबई रिटर्न आहेत. तर सर्वच जण आधीच क्वारंटाईन केले होते. तरीही काहींनी गावात जावून परत रुग्णालय गाठलेले असल्याने प्रवासी हिस्ट्री तपासण्यात येत आहे. 

सायंकाळी पुन्हा एकदा काही जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल आले. यामध्ये सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णसंख्या १२0 वर पोहोचली आहे. या तालुक्यात आधी फक्त जांभरुण रोडगे येथे दोघे आढळले होते. ते बरे होवून घरी सोडले आहेत. आता नव्याने मुंबईहून परतलेले खुडज येथील ९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर बरडा येथे दिल्लीहून परतलेले ३ जण पॉझिटिव्ह आहेत. याशिवाय गोरेगाव येथील क्वारंटाईनमधील सुरजखेडा येथील एकजणही पॉझिटिव्ह आढळला आहे. तोही मुंबईहून परतलेलाच असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास  हिंगोली येथील  लिंबाळा  विलगीकरण कक्षात  असलेल्या  31 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये  मुंबईहून  परतलेले  22, औरंगाबाद येथून परतलेले  चार, रायगड येथून परतलेला एक, कर्नाटकातील बिदरहून  आलेला एक, तर भिरडा येथील रुग्णाच्या संपर्कातील  दोघांसह एका  डॉक्टरलासुद्धा  कोरोनाची बाधा झाली आहे.

कळमनुरीत निरंकआता हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये किमान एक तरी रुग्ण आढळलेला आहे. मात्र कळमनुरी हा एकमेव तालुका आहे, जेथे आतापर्यंत एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. विशेष म्हणजे या तालुक्यात सर्वाधिक १0 हजार ३४७ जण परजिल्ह्यातून परतलेले आहेत. मुळात स्थलांतरित मजुरांची संख्या जास्त असलेला हा तालुका आहे. त्यामुळे ही कोरोनामुक्तीची परिस्थिती कायम राहण्यासाठी या तालुक्याला आणखी सतर्क राहावे लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली