शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी माणसे अर्धपोटी राहू शकतात, लेकराबाळांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

हिंगोली: पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांना मागील पाच दिवसांपासून काम मिळत नसल्यामुळे त्यांना अर्धपोटीच रात्र काढण्याची वेळ आली आहे. ...

हिंगोली: पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांना मागील पाच दिवसांपासून काम मिळत नसल्यामुळे त्यांना अर्धपोटीच रात्र काढण्याची वेळ आली आहे. मोठी माणसे अर्धपोटी राहू शकतात; पण लेकराबाळांचे काय? असा खडा सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे.

मागील पंधरा-वीस दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्च अशी सात दिवस जिल्ह्यात टाळेबंदी लागू केली आहे. शहरातील अकोला रोड, खटकाळी बायपास आदी मोकळ्या जागी पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेश तसेच विदर्भातून ५० कुटुंब हिंगोलीत दाखल झाले आहेत. मजुरी कामाबरोबर गॅस दुरुस्ती करणे, कूकर दुरुस्ती करणे, शेगड्या दुरुस्त करणे आदी कामे ही मंडळी करीत आहेत. याचबरोबर ऊस तोड आणि शेतातील कामावरही ही मजूर मंडळी जात असते. दरवर्षी कामाच्या शोधात हे मजूर हिंगोली जिल्ह्यासह आसपासच्या तालुक्यांतही वास्तव्य करून राहत आहेत.

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने डोके वर काढले. पाच महिने तर उपाशीपोटीच रहावे लागले. त्यावेळेस जिल्हा प्रशासनाने माणसी पाच किलोप्रमाणे अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू दिल्या. जिल्हा प्रशासन काळजी घेत असले तरी कोरोना कमी होण्याचे नाव घेत नाही. परिणामी, आमच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे अर्धपोटी उपाशी राहण्याची वेळ पालामध्ये राहणाऱ्या मजुरांवर आली आहे.

काबाडकष्ट केले तरच घरात धान्य येईल

कोरोनामुळे घरात बसण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नाही म्हटले एका पालमध्ये चार सदस्य आहेत. असे जवळपास पन्नास ते साठ मजूर कुटुंब आजमितीस हिंगोली शहरात राहत आहे. मजुरीशिवाय आमच्याजवळ कोणताही पर्याय नसल्यामुळे लॉकडाऊन केले की आम्हाला व लेकराबाळांना उपाशी राहण्याशिवाय पर्यायच राहत नाही. तेव्हा जिल्हा प्रशासनाने पालांमधील मजुरांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती मजुरांनी केली आहे.

फोटो एचएनएलपी६