शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१२ लघु तलाव गेले जोत्याच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST

हिंगोली : जिल्ह्यात एप्रिल अखेर १२ लघु तलाव जोत्याखाली गेले असून तरीही जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ६८ टक्के जलसाठा ...

हिंगोली : जिल्ह्यात एप्रिल अखेर १२ लघु तलाव जोत्याखाली गेले असून तरीही जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ६८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो २ टक्क्यांनी जास्त आहे. आता मे महिना लागल्याने काही भागात टंचाई जाणवत असली तरीही दरवर्षी एवढी यंदा तीव्रता नाही.

हिंगोली जिल्ह्यात दोन मोठे तर २६ लघु तलाव आहेत. दोन मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी धरणात ६६२.२२ दलघमी पाणीसाठा असून उपयुक्त साठा ५३७.५ दलघमी एवढा आहे. हे प्रमाण ६६.३८ टक्के आहे. गतवर्षी यात ६९.६८ टक्के जलसाठा होता. तर सिद्धेश्वर धरणात १४२ दलघमी पाणीसाठा असला तरीही त्यात उपयुक्त साठा शिल्लक राहिला नाही. गतवर्षी मात्र या महिन्यात या धरणातील साठा ५० टक्क्यांवर होता. मागच्या वर्षी मार्चमध्ये लागलेल्या कडक टाळेबंदीमुळे शेतीचा व्यवसायच ठप्प होता. अनेकांना उन्हाळी पिके घेता आली नाहीत. त्याचा परिणाम म्हणून साठा घटला नव्हता. यंदा निर्बंधांमध्ये कृषीला शिथिलता असल्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

लघु तलावांपैकी हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, हिरडी, पेडगाव, सेनगाव तालुक्यातील पिंपरी, बाभूळगाव, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, औंढा, पुरजळ, वंजारवाडी, काकडदाबा, केळी हे बारा तलाव जोत्याखाली गेले आहेत. तर हिंगोली तालुक्यात चोरजवळा १ टक्का, सवड ७ टक्के, हातगाव ८ टक्के, सेनगाव तालुक्यातील सवना ९ टक्के, घोडदरी २६, पूर्णा तालुक्यातील मरसूळ ३ टक्के, औंढा तालुक्यातील वाळकी ३० टक्के, सुरेगाव ६ टक्के, पिंपळदरी २४ टक्के, कळमनुरी तालुक्यातील बोथी २२ टक्के, कळमनुरी २४ टक्के, दांडेगाव १९ टक्के, देवधरी २० टक्के, वसमत तालुक्यातील राजवाडी ९ टक्के असा जलसाठा आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये ६८ टक्के जलसाठा आहे. यात सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा येथे ७५ टक्के, खेर्डा येथे २२ टक्के, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा येथे १०० टक्के, परभणी तालुक्यातील रहाटी येथे ८१ टक्के जलसाठा आहे.