शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

...म्हणून केळीच्या पानांवर जेवण करणं ठरतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 3:03 PM

केळीच्या पानांना धार्मिक महत्त्व असून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पूजेसाठीदेखील यांचा वापर करण्यात येतो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची फार जुनी परंपरा आहे.

केळीच्या पानांना धार्मिक महत्त्व असून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पूजेसाठीदेखील यांचा वापर करण्यात येतो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची फार जुनी परंपरा आहे. विशेषकरून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये केळीच्या पानांवर जेवण करणं आरोग्यासाठी फायदेशीर समजलं जातं. या पानांचा उपयोग फक्त जेवण्यासाठीच नाही तर जेवण शिजवण्यासाठीही करण्यात येतो. या पानांना सर्वाधिक हायजेनिक आणि आरोग्यदायी मानण्यात येतं. या पानांवर एकाच वेळी सर्व पदार्थ ठेवता येतात. परंतु, तुम्ही कधी विचार केलाय का? याच पानांचा जेवण वाढण्यासाठी उपयोग का करण्यात येतो? 

केळीच्या पानांवर जेवण्याचे फायदे :

अ‍ॅन्टीऑक्सिडंट 

केळीच्या पानांमध्ये प्राकृतिक अ‍ॅन्टीऑक्सिडंट म्हणजेच पॉलीपेनॉल्स आढळून येतात. हे अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स अनेक वनस्पतींपासून प्राप्त होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये आढळून येतात. जर तुम्ही केळीच्या पानांवर जेवण वाढत असाल तर ते पदार्थ केळीच्या पानांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट त्या पदार्थांमध्ये शोषले जातात. जे आपल्या शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात. 

जेवणाची चव वाढवतात

केळीच्या पानांवर एक प्रकारची वॅक्स कोटींग असते. ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चव असते. यांवर गरम पदार्थ वाढल्याने पानांवर असलेलं वॅक्स कोटींग विरघळून जातं आणि पदार्थांची चव वाढवतात. 

हायजेनिक

केळीच्या पानांना स्वच्छ करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज नसते. ही फक्त पाण्याने स्वच्छ धुतल्यास लगेच स्वच्छ होतात. सामान्य भांडी स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे त्यांच्यामध्ये काही जंतू राहण्याची शक्यता असते. परंतु केळीच्या पानांवर जेवल्याने तुम्हाला फायदाच होतो. 

केमिक्सपासून सुटका

तुम्ही डिशवॉशरमध्ये भांडी स्वच्छ करा किंवा स्वतःच्या हाताने साबणाच्या मदतीने भांडी स्वच्छ करा. या केमिकल्सचे ट्रेसेस तुमच्या भांड्यांवरही तसेच राहतात. केळीच्या पानांवर कोणतेही केमिकल्स नसतात आणि आरोग्यासाठीही घातक नसतात. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स