शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
4
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
5
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
6
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
7
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
8
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
9
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
11
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
12
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
13
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
14
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
15
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
16
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
17
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
18
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
19
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
20
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 13:59 IST

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरसचे भयंकर परिणाम जगभरात दिसून येत आहेत. पण आपण सगळेचजण यामधून बाहेर येऊ शकतो.

कोरोनाने गेल्या सहा महिन्यांपासून जगभरात कहर केला आहे. जगभरातील सर्वात जास्त रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील भाषावाद आणि राजनैतिक विश्लेषक नॉम चॉम्स्की यांनी दावा केला आहे की, कोरोनाची माहामारी ही घातक असली तरी या दोन संकटांपेक्षा खूपच लहान आहे.  डीआययएम-25 टीव्हीशी बोलताना  ९१ वर्षीय विश्लेषक नॉम चॉम्स्की यांनी सांगितले की,'' कोरोना व्हायरस हा ट्रम्प सरकारच्या काळात आला असून दिवसेंदिवस जास्त धोकादायक ठरत आहे. कोरोना व्हायरसचे भयंकर परिणाम जगभरात दिसून येत आहेत. पण आपण सगळेचजण यामधून बाहेर येऊ शकतो. पण इतर दोन संकटापासून वाचणं कठीण आहे. यामुळे सर्वच उधवस्त होऊ शकतं. अमेरिकेची वाढत जाणारी क्षमता विनाशाचं कारण ठरू शकते. ''

डाऊन टू अर्थ पत्रात छापण्यात आलेल्या या मुलाखतीत नॉम्स चॉम्स्की यांनी सांगितले की, ''क्यूबा यूरोपची मदत करत आहे पण जर्मनी ग्रीसची मदत करण्यासाठी तयार नाही. कोरोना व्हायरसची माहामारी  आपल्या कशाप्रकारचं जग हवयं असा विचार करण्यास प्रवृत्त करत आहे. सार्स माहामारी स्वरूप बदलून कोरोना व्हायरसच्या रुपात समोर येऊ शकते. याची कल्पना आधीपासूनच होती. श्रीमंत देश कोरोना व्हायरसच्या लसीवर काम करू शकत होते. परंतू त्यांनी असं काही केलेलं नाही. मनमानी पद्धतीनं औषध आणि लसीचा कारभार केला जात आहे. 

पुढे ते म्हणाले की,'' ऑक्टोबर २०१९ मध्ये अमेरिकेनं कोरोनासारख्या माहामारीबाबत शंका व्यक्त केली होती. पण कोणीही या कडे फारसं लक्ष दिलं  नाही. ३१ डिसेंबरला चीननं जागतिक आरोग्य संघटनेला निमोनिया बाबत सुचित केलं त्यानंतर एका आठवड्यानंतर चीनी वैज्ञांनिकांनी कोरोना व्हायरसचं रुप ओळखलं. त्यानंतर संपूर्ण जगाला याबाबत कल्पना देण्यात आली.  आज २ कोटींपेक्षा जास्त लोक क्वारंटाईन आहेत. सामाजिक भेद अनेक वर्षांपासून चालत आला आहे. त्यामुळे मोठं नुकसानही होतआहे. या महामारीतून बाहेर येण्याससाठी यातून बाहेर यायला हवं. गरजवंताची मदत करायला हवी. गरजवंताची मदत करणं, विकास  कारायला हवा. या समस्यांवर विचारविमर्श करून त्यावर उपाय शोधायला हवेत. ''

राज्यात झपाट्यानं होतोय कोरोनाचा प्रसार; आता मृतांचीही रॅपिड एंटीजन टेस्‍ट होणार

देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं हाहाकार निर्माण केला आहे. तर राज्यात १० लाखांपेक्षा अधिक लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे.  आतापर्यंत २९ हजार लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत आता मृतांची एंटीजन टेस्ट करण्याचा करण्याचा निर्णय सरकारने  घेतला आहे. याद्वारे रुग्णालयात दाखल होत असलेल्या प्रत्येक  मृत व्यक्तीची एंटीजन टेस्ट करून त्यावेळी ती व्यक्ती कोरोना संक्रमित होती की नाही हे पाहिलं जाणार आहे. 

सरकारने सध्या टीबीच्या चाचणीसाठीही परवागनी दिली आहे. या टेस्टद्वारे व्यक्तीला कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला होता का, हे पाहिलं जाणार आहे. चाचणीनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल. देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे शवगृहांमध्ये जागा शिल्लक नाही. ससून सरकार रुग्णालयात एका दिवसात जवळपास ४० ते ५० लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे.  दररोज कमीत कमी १५ मृत्यू झालेल्या रुग्णांना त्या ठिकाणी आणलं जातं.

राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात  वेगानं वाढत असलेल्या कोरोना संक्रमण लक्षात घेता  मृतांची एंटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे एका तासात कोरोना संक्रमणाबाबत माहिती मिळवता येऊ शकते. त्यानंतर लगेचच नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यात येईल.  लवकरात लवकर त्याचे अंतिम संस्कार करण्यास मदत होईल.  २१ ऑगस्टला जारी करण्यात आलेल्या एका पत्रात या एंटीजन टेस्टच्या माध्यमातून चुकीचा रिपोर्ट येण्याच्या घटनांबबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. मृत शरीराची ऑटोप्सी केल्यानतर फॉरेंसिक विभागातील कार्मचाऱ्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता होती. म्हणून आयसीएमआरच्या सल्ल्यानुसार राज्यात फॉरेंसिक ऑटोप्सी बंद करण्याच निर्णय घेण्यात आला होता. 

हे पण वाचा-

चिंताजनक! राज्यात झपाट्यानं होतोय कोरोनाचा प्रसार; आता मृतांचीही रॅपिड एंटीजन टेस्‍ट होणार

मधात दालचीनी मिसळून खाल; तर पोटाच्या विकारांसह 'या' ५ समस्यांपासून नेहमी दूर राहाल

टॅग्स :AmericaअमेरिकाHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या