शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

"मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ; मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 1:09 AM

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्य, आत्महत्या आणि आपल्याला त्रास देणाºया गोष्टींबद्दल बोलण्याची गरज याविषयीच्या चर्चांना उधाण आलेय.

वेदवती परांजपे - सुर्वेमुळात ‘आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल बोला रे!’ असे कितीही पोस्ट, स्टेटस आणि लेखांनी घसा फोडून सांगितले, तरी तसे करणे कठीण आहे, हे आधी आपण सर्वांनी मान्य करायला हवे. तुम्हीच विचार करा, मनाच्या खोल तळाशी, कुठल्यातरी कप्प्यात घट्ट बंद करून ठेवलेल्या त्रासांबद्दल बोलणे एवढे सोपे कसे असेल? शिवाय, तसे बोलायचे ठरवले तरी तेवढा संवेदनशील, खरीखुरी काळजी असणारा श्रोता मिळेलच, याची शाश्वती काय? इतके कष्ट घेण्यापेक्षा रोजच्या रुटीनमध्ये, भरपूर कामांमध्ये (दुर्दैवाने कधी दारू, सिगारेटमध्ये) या सगळ्या त्रासाला बुडवून टाकणे आपल्याला जास्त सोपे वाटते. या बुडवाबुडवी प्रक्रियेमुळे आपल्याला वाटते की, आता हे त्रास संपले, सगळे काही ठीक चाललेय. मित्रांनो, लक्षात घ्या, असे वाटणे हा फक्त आभास आहे. अशा खोलवर दाबून, दडपून ठेवलेल्या त्रासदायक भावना, विचार, कल्पना आपोआप नष्ट होत नसतात. काही काळासाठी त्या बाजूला ठेवल्या जातात एवढेच. पण, जेव्हा कधी तुम्ही एकटे असाल, जेव्हा अतिशय गुंतवून टाकणारे काम तुमच्याकडे नसेल, तेव्हा आॅक्टोपससारखे हे सगळे त्रास हळूहळू तुमच्याभोवती पाश आवळायला तयार असतील. त्याची परिणती कधी आत्महत्येमध्ये होऊ शकते, कधी व्यसनांमध्ये, तर कधी रक्तदाब, मधुमेहासारख्या शारीरिक व्याधींमध्ये. यातला कुठलाच परिणाम अर्थातच हवाहवासा नाही आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी स्वत:च्या दुखऱ्या भावना व्यक्त करण्याचे शिवधनुष्य हे प्रत्येकाला पेलायलाच हवे. त्या ऐकून घेणारा श्रोता-मित्र, भाऊ-बहीण, आई-बाबा, शिक्षक जर तुमच्याकडे असतील, तर छानच आहे. पण, तसं नसेल तर त्यासाठी समुपदेशकांची मदत घ्यायला हवी.

आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही आपल्या समाजात समुपदेशन करून घेण्याबद्दल असलेला दूषित पूर्वग्रह. समुपदेशक/ मानसतज्ज्ञ म्हणून काम करताना लोकांच्या मनात असलेल्या ज्या पूर्वसमजुती नेहमी आढळून येतात, त्याबद्दल थोडेसे लिहिणे आवश्यक वाटते. समुपदेशकाकडे जाणे, हे अजूनही काहीतरी भयंकर समजले जाते. जो अशी मदत घेतो, तो समाजाच्या नजरेत एकतर अगदी वेडा ठरतो किंवा स्वत:चे प्रॉब्लेम स्वत: ज्याला सोडवता येत नाहीत, असा दुबळा! याचे उत्तर फक्त एवढेच आहे की, असा माणूस स्वत:चं जीवन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून धडपडणारी एक व्यक्ती आहे आणि असा ध्यास असणे, हे खरंतर अतिशय शहाणपणाचे लक्षण आहे.

जिथे मलाच माझ्या भावना नीट कळेना झाल्यात, तिथे समुपदेशकाला काय कळणार त्या, असेही बºयाच लोकांना वाटते. पण, एक लक्षात घ्या, कुठल्याही समुपदेशकाने याचेच तर प्रशिक्षण घेतलेले असते! आमच्याकडे येताना लोकांनी एकसंध सुरेख भावना, विचार, त्रास यांचा निबंध घेऊन यावा, अशी मुळी आमची अपेक्षाच नसते. उलट, ते तसे नसणार, हे गृहीत धरून, त्या भावना अजून सुस्पष्ट कशा करता येतील, याचा विचार आम्ही केलेला असतो. तेव्हा काय बोलू, कसे बोलू, याचा फारसा विचार न करता खुशाल मोबाइल अनलॉक करा आणि समुपदेशकाचा नंबर फिरवा.

हा नंबर मिळवण्यासाठी गुगलबाबा, फेसबुक-इन्स्टाग्राम, कदाचित काही परिचितांकडून मिळणारा संदर्भ, असे पर्याय उपलब्ध आहेतच. मात्र, ज्या समुपदेशकाकडे जाणार असाल, त्याच्या शैक्षणिक पदव्या, अनुभव हे सर्व नक्की तपासून पाहा. मानसतज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने समुपदेशन किंवा चिकित्साविषयक मानसशास्त्र असा विशेष विषय घेऊन ट.अ. केलेले असले पाहिजे. समुपदेशक म्हणवून घेणाऱ्यांनी किमान एक ते दीड वर्षाचा एखाद्या मान्यताप्राप्त विश्वविद्यालयातून केलेला असला पाहिजे. दुर्दैवाने दोन-तीन महिन्यांचे छोटे-मोठे कोर्सेस करून स्वत:ला समुपदेशक म्हणून जाहीर करणाºया व्यक्तींची संख्या भारतात कमी नाही. त्यांचा उद्देश कितीही चांगला असला, तरी केवळ दोन-तीन महिन्यांचे प्रशिक्षण इतक्या नाजूक बाबी हाताळणाºया क्षेत्रासाठी पुरेसे नाही.

लेख संपवताना एकच गोष्ट नमूद करते. काही वर्षे या क्षेत्रात काम करताना मी अवसाद व्यक्त होण्याचा अचंबा वाटावा, इतक्या तºहा पाहिल्या आहेत. कधी छोट्याछोट्या गोष्टींमुळेसुद्धा सतत येणारे चिडचिडेपण, कधी कारणाशिवाय सारखी पाठपुरावा करणारी उदासीनता, कधी निद्रानाश तर कधी खूप जास्त येणारी झोप, कधी खाण्यावरून उडालेलं मन, तर कधी खूप वाढलेले जेवणाचे प्रमाण, कधी हुंदके तर कधी नुसताच निरुत्साह, कधी नेहमीचे काम करण्यासाठी होणारे कष्ट आणि आता काहीच करता येणार नाही, अशी टोचणारी अफाट निराशा, कधी आता सगळे संपवूनच टाकू या, अशी लागलेली दुर्दैवी आस. यापैकी काहीही तुम्हाला तुमच्या वागण्यात दिसत असेल किंवा तुमच्या जवळच्या जिवलग व्यक्तीमध्ये ही लक्षणे आढळून येत असतील, तर समुपदेशकांची मदत लवकर घ्या. मानसिक आरोग्यविषयक समस्या कोणालाही भेडसावू शकतात. मनाचा विचार करताना मला सुधीर मोघ्यांची एक सुप्रसिद्ध कविता नेहमी आठवते. मनाच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाचे वर्णन करताना ते लिहितात,

‘मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेलेमन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेलेमन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा’...आणि खरोखरच आपल्या मनाचा थांग भल्याभल्यांनासुद्धा नेहमीच लागतो, असे नाही. पण, पायात रुतलेला काटा जसा आपण त्वरित काढून फेकून देतो, त्याला लपवून, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही तसेच मनाच्या समस्यांचा सामना करण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठा, खूप कठीण नाही, तर सहज सोपा हवा. कवितेतील पुढच्याच ओळी मनाची दोन वेगळी रूपे अधोरेखित करतात,‘मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळमन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल’तर, आपल्या नाठाळ मनाला तेजाचे राऊळ बनवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे आणि केवळ एक दिवसापुरते नाही तर रोजच्या रोज करण्याचे काम आहे, एवढी आठवण देऊन हा शब्दप्रपंच आवरता घेते.अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्य, आत्महत्या आणि आपल्याला त्रास देणाºया गोष्टींबद्दल बोलण्याची गरज याविषयीच्या चर्चांना उधाण आलेय. अर्थात, चर्चा तर व्हायलाच हवी. पण, दुर्दैवाची बाब ही आहे की, मानसिक आरोग्यविषयक अशी चर्चा होण्यासाठी इतके भयंकर काहीतरी घडावे लागते. अजून खेद वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे चार दिवस, आठवडाभर चर्चा, स्टेटस, पोस्ट करून सगळे सोशल नेटकरी मानसिक आरोग्य ही कल्पना विसरून दुसºया कुठल्या तरी खळबळजनक बातमीबद्दल बोलतील. गरज आहे ती चर्चेच्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्याची - स्वत:साठी, स्वत:च्या जिवलगांसाठी आणि समाजासाठीसुद्धा. ते नेमके काय हे सांगण्याचा प्रयत्न म्हणून हा लेखप्रपंच.

(लेखिका मानसतज्ज्ञ असून समुपदेशन मानसशास्त्रात त्यांनी एम.ए., तर औद्योगिक मानसशास्त्रातही एम.ए. केले आहे.)

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्या