शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एकटेपणा ठरु शकतो जीवघेणा, जाणून घ्या कसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 10:32 IST

जर तुम्हाला फार जास्त मित्र नसतील किंवा तुम्हाला फार जास्त लोकांसोबत भेटीगाठी घेणं आवडत नसेल तर तुमच्यासाठी एका वाईट बातमी आहे.

जर तुम्हाला फार जास्त मित्र नसतील किंवा तुम्हाला फार जास्त लोकांसोबत भेटीगाठी घेणं आवडत नसेल तर तुमच्यासाठी एका वाईट बातमी आहे. म्हणजे तुम्हाला एकटेपणामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका ४० टक्क्यांनी वाढतो. हे आम्ही नाही तर एक रिसर्च सांगतोय. त्यासोबतच या रिसर्चमध्ये हेही सांगण्यात आले आहे की, एकटेपणामुळे वेळेआधी मृत्यू म्हणजेच अकाली मृत्यू होण्याचा धोकाही ५० टक्क्यांनी वाढतो. 

डेनमार्क येथील कॉपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या द हार्ट सेंटर हॉस्पिटलमधील अभ्यासक अॅने विनगार्ड क्रिस्टेनसेन यांनी यावर अभ्यास केला. त्यांनी वेगवेगळ्या २१८ रिसर्चचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी आरोग्यवर एकटेपणाचा होणारा प्रभाव याची माहिती मिळवली. यात त्यांना आढळले की, याचा फटका ४ मिनियन लोकांना बसतो आहे. तसेच या रिसर्चमधून हेही समोर आले आहे की, जे लोक आधीपासूनच हृदयरोगांनी ग्रस्त आहेत, त्यातील जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू हा एकटेपणामुळे झाला.

का होतं असं?

रिसर्चनुसार, जे लोक एकटेपणाचे शिकार असतात, त्यांना क्रॉनिक डिजीज होण्याचा धोका अधिक जास्त असतो. तसेच अशा लोकांमध्ये डिप्रेशनचा धोकाही अधिक जास्त असतो. 

रिसर्च सांगतो की, जे लोक समाजात राहूनही एकटे राहतात किंवा त्यांची इतर लोकांमध्ये उठ-बस कमी असल्याने कॉर्डियोवस्कुलर आजाराने ग्रस्त असतात, त्यांच्या मृत्यूचा धोका अधिक असतो. मित्र आणि परिवारात राहून लोक या आजारापासून बचाव करु शकतात.  

आणखीही काही कारणं

१) एकटेपणामुळे डिप्रेशनची शक्यता वाढते. जर तुम्ही एकटेपणाचे शिकार असाल, फार निराश असाल किंवा फार जास्त दुरावल्यासारखं वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे संकेत तुम्हासाठी पुढे फार हानिकारक ठरु शकतात. २) जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा त्यावेळी भविष्य आणि करिअरबाबत विचार करुन फार तणाव वाढतो. याने तुमच्या आरोग्यवरही वेगवेगळ्या दृष्टीने प्रभाव पडतो.

३) एकटेपणाचा प्रभाव तुमच्या डाएट आणि खाण्या-पिण्याच्या सवयींवरही पडतो. अशावेळी अनेकजण जंकफूड फार जास्त खातात आणि एक्सरसाइजही करत नाहीत. आरोग्याच्या दृष्टीने हे फारच वाईट आहे आणि याचा परिणाम आपल्या शरीरावरही दिसू लागतो. 

काय करावे?

1) आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आणि मित्र परिवाराच्या संपर्कात रहा. तसेही एकटे राहत असताना नातं तयार करणं कठीण आहे. पण असं करुनच तुम्हाला फायदा मिळू शकतो. 

२) जेव्हाही एकटेपणा जाणवेल तर कुठे जाऊन कुणा तरी भेटा. याने तुम्हाला होणारा ताण कमी होईल.

३) नाती सुधारण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त वेळ परिवारासोबत आणि मित्रांसोबत घालवण्याचा प्रयत्न करा. 

हेही ध्यानात ठेवा की, मनुष्य हा शारीरिक आणि मानसिक रुपाने समाजात राहण्यासाठी जन्माला आला आहे. एकटं राहणं हा आपला गुण नाही. पण जर तुम्ही एकटेपणाचे शिकार झाले असाल तर याचा अर्थ हा होतो की, निसर्गाने आपल्याला जसं बनवलं, तुम्ही त्याच्या विरोधात जाताय. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स