शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

एकटेपणा ठरु शकतो जीवघेणा, जाणून घ्या कसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 10:32 IST

जर तुम्हाला फार जास्त मित्र नसतील किंवा तुम्हाला फार जास्त लोकांसोबत भेटीगाठी घेणं आवडत नसेल तर तुमच्यासाठी एका वाईट बातमी आहे.

जर तुम्हाला फार जास्त मित्र नसतील किंवा तुम्हाला फार जास्त लोकांसोबत भेटीगाठी घेणं आवडत नसेल तर तुमच्यासाठी एका वाईट बातमी आहे. म्हणजे तुम्हाला एकटेपणामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका ४० टक्क्यांनी वाढतो. हे आम्ही नाही तर एक रिसर्च सांगतोय. त्यासोबतच या रिसर्चमध्ये हेही सांगण्यात आले आहे की, एकटेपणामुळे वेळेआधी मृत्यू म्हणजेच अकाली मृत्यू होण्याचा धोकाही ५० टक्क्यांनी वाढतो. 

डेनमार्क येथील कॉपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या द हार्ट सेंटर हॉस्पिटलमधील अभ्यासक अॅने विनगार्ड क्रिस्टेनसेन यांनी यावर अभ्यास केला. त्यांनी वेगवेगळ्या २१८ रिसर्चचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी आरोग्यवर एकटेपणाचा होणारा प्रभाव याची माहिती मिळवली. यात त्यांना आढळले की, याचा फटका ४ मिनियन लोकांना बसतो आहे. तसेच या रिसर्चमधून हेही समोर आले आहे की, जे लोक आधीपासूनच हृदयरोगांनी ग्रस्त आहेत, त्यातील जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू हा एकटेपणामुळे झाला.

का होतं असं?

रिसर्चनुसार, जे लोक एकटेपणाचे शिकार असतात, त्यांना क्रॉनिक डिजीज होण्याचा धोका अधिक जास्त असतो. तसेच अशा लोकांमध्ये डिप्रेशनचा धोकाही अधिक जास्त असतो. 

रिसर्च सांगतो की, जे लोक समाजात राहूनही एकटे राहतात किंवा त्यांची इतर लोकांमध्ये उठ-बस कमी असल्याने कॉर्डियोवस्कुलर आजाराने ग्रस्त असतात, त्यांच्या मृत्यूचा धोका अधिक असतो. मित्र आणि परिवारात राहून लोक या आजारापासून बचाव करु शकतात.  

आणखीही काही कारणं

१) एकटेपणामुळे डिप्रेशनची शक्यता वाढते. जर तुम्ही एकटेपणाचे शिकार असाल, फार निराश असाल किंवा फार जास्त दुरावल्यासारखं वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे संकेत तुम्हासाठी पुढे फार हानिकारक ठरु शकतात. २) जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा त्यावेळी भविष्य आणि करिअरबाबत विचार करुन फार तणाव वाढतो. याने तुमच्या आरोग्यवरही वेगवेगळ्या दृष्टीने प्रभाव पडतो.

३) एकटेपणाचा प्रभाव तुमच्या डाएट आणि खाण्या-पिण्याच्या सवयींवरही पडतो. अशावेळी अनेकजण जंकफूड फार जास्त खातात आणि एक्सरसाइजही करत नाहीत. आरोग्याच्या दृष्टीने हे फारच वाईट आहे आणि याचा परिणाम आपल्या शरीरावरही दिसू लागतो. 

काय करावे?

1) आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आणि मित्र परिवाराच्या संपर्कात रहा. तसेही एकटे राहत असताना नातं तयार करणं कठीण आहे. पण असं करुनच तुम्हाला फायदा मिळू शकतो. 

२) जेव्हाही एकटेपणा जाणवेल तर कुठे जाऊन कुणा तरी भेटा. याने तुम्हाला होणारा ताण कमी होईल.

३) नाती सुधारण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त वेळ परिवारासोबत आणि मित्रांसोबत घालवण्याचा प्रयत्न करा. 

हेही ध्यानात ठेवा की, मनुष्य हा शारीरिक आणि मानसिक रुपाने समाजात राहण्यासाठी जन्माला आला आहे. एकटं राहणं हा आपला गुण नाही. पण जर तुम्ही एकटेपणाचे शिकार झाले असाल तर याचा अर्थ हा होतो की, निसर्गाने आपल्याला जसं बनवलं, तुम्ही त्याच्या विरोधात जाताय. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स