शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

मुलांना होणारा क्षय कसा ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 1:17 PM

क्षयरोगाचे खोकल्यापेक्षा दुसरे कोणतेही लक्षण आपल्याला माहिती नसते त्यामुळे क्षयाचे निदान लवकर होत नाही. त्यामुळे काही लक्षणे दिसून आल्यास मुलांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते.

मुंबई- जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 10 लाख मुलांना दरवर्षी क्षयरोग होतो. उपचार वेळीच न मिळाल्यामुळे त्यातील 2 लाख मुलांना आपले प्राण गमवावे लागतात. क्षयरोगाचे खोकल्यापेक्षा दुसरे कोणतेही लक्षण आपल्याला माहिती नसते त्यामुळे क्षयाचे निदान लवकर होत नाही. त्यामुळे काही लक्षणे दिसून आल्यास मुलांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते. पुढील काही लक्षणांकडे लक्ष ठेवल्यास मुलांना टीबीपासून वाचवता येणे शक्य आहे.वयानुसार मुलांची वाढ होणे गरजेचे आहे. मात्र काही मुलांची प्रकृती नाजूक असते. त्यांच्या शरीराची वाढ होत नाही. योग्य आहार आणि काळजी घेऊनही त्यांची वाढ होत नसेल तर मुलांची डॉक्टरकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.

 अनेकदा लहान मुलांच्या गळ्याच्या शिरा सुजलेल्या दिसतात. कधीकधी मुलांना यामुळे वेदना होत असतात. अशा स्थितीतही डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मुलांना वारंवार थंडी लागत असेल तरीही त्यांची क्षयाची तपासणी करून घेतली पाहिजे. डॉक्टरांना दाखवून वारंवार थंडी लागणे, ताप येणे, घाम य़ेणे अशा तक्रारींचे निदान करुन घ्यावे.

15 वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या काही मुलांच्या छातीमध्ये सतत दुखत असते. जर बाहेरून कोणतीही जखम झालेलली नसता त्यांना वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

जर 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, अचानक वजन घटणे अशी लक्षणे दिसली तरीही त्यांना तात्काळ डॉक्टरला दाखवणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स