शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

सायलेंट पेंडामिक : गर्दीमध्येही अनेक जण एकटेच; भारतात ४३% लोक जगताहेत एकाकी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:09 IST

जागतिक आरोग्य संघटनेने एकाकीपणाला आता 'जागतिक आरोग्य संकट' म्हणून घोषित केले आहे

नवी दिल्ली: आजच्या वेगवान युगात इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले असल्याचे वाटत असले, तरी प्रत्यक्षात मानवी जीवनात एकाकीपणाची दरी निर्माण झाली आहे. एकाकीपणा ही २१ व्या शतकातील एक 'सायलेंट पेंडामिक' बनली असून, जगातील प्रत्येक चौथी व्यक्ती आज स्वतःला एकटे समजत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने एकाकीपणाला आता 'जागतिक आरोग्य संकट' म्हणून घोषित केले आहे. एकाकीपणाचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो.

काय उपाय करावेत? 

सामाजिक संवादः शाळा, कार्यालय आणि कुटुंबात लोकांशी संवाद वाढवा. छंदांना वेळ द्याः स्वतःचे छंद जोपासा, जेणेकरून रिकाम्या वेळेत नकारात्मक विचार येणार नाहीत. 

ज्येष्ठांशी, मुलांशी संवाद: घरातील वृद्ध आणि मुलांशी नियमित चर्चा करा

भारतातील स्थिती

भारतामध्ये तरुणांमध्ये एकाकीपणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आकडेवारीनुसार, १५ ते १९ वयोगटातील प्रत्येक पाचवा तरुण (२०%) एकाकीपणा जाणवत असल्याचे सांगतो. शहरांमध्ये हे प्रमाण अधिक असून ४३ टक्के शहरी लोक एकाकीपणाचा अनुभव घेत आहेत. ६० वर्षावरील ज्येष्ठांमध्ये हे प्रमाण २० ते ३३ टक्क्यांच्या दरम्यान आहे. ग्रीस आणि सायप्रस हे देश जगात एकाकीपणाच्या बाबतीत आघाडीवर असले तरी भारतही या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

एकाकीपणाची कारणे?

बदलती जीवनशैली : लॉकडाऊननंतर सामाजिक अंतर आणि नात्यांमधील भावनिक ओलावा कमी झाला आहे. 

नोकरी आणि नात्यांमधील तणाव : बेरोजगारी, कामाच्या ठिकाणचा ताण आणि वैयक्तिक नात्यांमधील कडू संवादामुळे लोक स्वतःला इतरांपासून वेगळे करत आहेत. यातूनच नैराश्य, आत्मविश्वासाची कमतरता या समस्या निर्माण होतात.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Silent pandemic: Loneliness grips India, affecting 43% in cities.

Web Summary : Loneliness is a growing global health crisis, especially among Indian youth. Changing lifestyles, job stress, and strained relationships contribute. 43% of urban Indians feel isolated. Social interaction, hobbies, and connecting with family are crucial solutions.
टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य