शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

जास्त जीवन जगणं म्हणजे निरोगी जीवन नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 10:05 IST

आरोग्याबाबत जगभरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता वाढून सुद्धा लोकांच्या आरोग्यात फार जास्त सुधारणा झालेली बघायला मिळत नाही.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या स्टॅन्फोर्ड यूनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे की, मनुष्याचा निरोगी जीवन जगण्याचा कालावधी आधीच्या तुलनेत वाढला आहे आणि आता येणारी पिढी आधीच्या पिढ्यांपेक्षा ३ वर्ष जास्त जीवन जगत आहेत. या अभ्यासासाठी अभ्यासकांनी गेल्या ५० वर्षातील माहितीचं विश्लेषण केलं. त्यात अभ्यासकांना असे आढळले की, जे लोक ६५ वर्षांपर्यंत जिवंत राहतात ते त्यांच्या आई-वडिलांच्या तुलनेत जास्त जीवन जगतात.

मात्र, लाइफ एक्सपेक्टेंसी म्हणजेच जिवंत राहण्याचा काळ वाढणे याचा अर्थ लोक निरोगी जीवन जगत आहेत, असा होत नाही. लॅन्सेटच्या एका अभ्यासानुसार २०१७ मधील एका डेटामध्ये असे आढळले की, आरोग्याबाबत जगभरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता वाढून सुद्धा लोकांच्या आरोग्यात फार जास्त सुधारणा झालेली बघायला मिळत नाही. याचं स्पष्टीकरण पुढील आकडेवारीवरुन लक्षात घेता येईल. म्हणजे २०१७ मध्ये ग्लोबल लाइफ एक्सपेक्टेंसी ७३ वर्ष इतकी होती. यातील निरोगी जीवन जगण्याचा कालावधी हा ६३ वर्ष होता. म्हणजे लोकांचं १० वर्षांचं आयुष्य खराब किंवा वेगवेगळ्या आजारांनी वेढलेलं होतं.

१९९० च्या तुलनेत २०१७ मध्ये लोकांच्या निरोगी जीवन जगण्याच्या कालावधीमध्ये ६ वर्ष ३ महिन्यांची वाढ झाली. २०१७ मध्ये हेल्थ लाइफ एक्सपेक्टेंसीच्या बाबतीत सिंगापूर हा देश पहिल्या क्रमांकावर होता. तर मध्य आफ्रिका रिपब्लिक शेवटच्या क्रमांकावर होता. १९९० ते २०१७ दरम्यान communicable म्हणजेच स्पर्शाने पसरणारे रोग आणि नवजात बाळांच्या संबंधित आजारांची प्रकरणे ४१ टक्क्यांनी कमी झाली आहेत. तर non-communicable म्हणजेच स्पर्शाने न होणाऱ्या आजारांमध्ये ४० टक्के वाढ झालेली बघायला मिळाली. वाढ झालेली ही आकडेवारी चिंताजनक आहे. 

भारतीय लोकसंख्येचा विचार करायचा तर १९९० च्या तुलनेत २०१७ मध्ये भारतातील लोक चांगल्या आरोग्यासोबत १० वर्ष जास्त जगत होते. १९९० मध्ये महिलांचा निरोगी जीवनकाळ हा ५० वर्ष होता, तो आता २०१७ मध्ये वाढून ५९ वर्ष झाला आहे. आणि पुरुषांचं सांगायचं तर १९९० मध्ये पुरुषांची हेल्दी लाइफ एक्सपेक्टेंसी म्हणजेच निरोगी जीवनकाळ ५१ वर्ष होता. तो आता २०१७ मध्ये वाढून ५९ वर्ष झाला आहे.  

ही आकडेवारी हेच सांगते की, जरी लोकांचा जीवन जगण्याचा कालावधी वाढला असेल, पण त्यांच्यांत वेगवेगळ्या आजारांचंही प्रमाण वाढलं आहे. अनेकजण फार कमी आयुष्य निरोगी जगत आहेत. महत्त्वाची बाब म्हणेज आरोग्याबाबत इतकी जागरुकता असूनही लोक आरोग्याकडे फार गांभिर्याने बघतातच असे दिसत नाही.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स