शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

जास्त जीवन जगणं म्हणजे निरोगी जीवन नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 10:05 IST

आरोग्याबाबत जगभरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता वाढून सुद्धा लोकांच्या आरोग्यात फार जास्त सुधारणा झालेली बघायला मिळत नाही.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या स्टॅन्फोर्ड यूनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे की, मनुष्याचा निरोगी जीवन जगण्याचा कालावधी आधीच्या तुलनेत वाढला आहे आणि आता येणारी पिढी आधीच्या पिढ्यांपेक्षा ३ वर्ष जास्त जीवन जगत आहेत. या अभ्यासासाठी अभ्यासकांनी गेल्या ५० वर्षातील माहितीचं विश्लेषण केलं. त्यात अभ्यासकांना असे आढळले की, जे लोक ६५ वर्षांपर्यंत जिवंत राहतात ते त्यांच्या आई-वडिलांच्या तुलनेत जास्त जीवन जगतात.

मात्र, लाइफ एक्सपेक्टेंसी म्हणजेच जिवंत राहण्याचा काळ वाढणे याचा अर्थ लोक निरोगी जीवन जगत आहेत, असा होत नाही. लॅन्सेटच्या एका अभ्यासानुसार २०१७ मधील एका डेटामध्ये असे आढळले की, आरोग्याबाबत जगभरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता वाढून सुद्धा लोकांच्या आरोग्यात फार जास्त सुधारणा झालेली बघायला मिळत नाही. याचं स्पष्टीकरण पुढील आकडेवारीवरुन लक्षात घेता येईल. म्हणजे २०१७ मध्ये ग्लोबल लाइफ एक्सपेक्टेंसी ७३ वर्ष इतकी होती. यातील निरोगी जीवन जगण्याचा कालावधी हा ६३ वर्ष होता. म्हणजे लोकांचं १० वर्षांचं आयुष्य खराब किंवा वेगवेगळ्या आजारांनी वेढलेलं होतं.

१९९० च्या तुलनेत २०१७ मध्ये लोकांच्या निरोगी जीवन जगण्याच्या कालावधीमध्ये ६ वर्ष ३ महिन्यांची वाढ झाली. २०१७ मध्ये हेल्थ लाइफ एक्सपेक्टेंसीच्या बाबतीत सिंगापूर हा देश पहिल्या क्रमांकावर होता. तर मध्य आफ्रिका रिपब्लिक शेवटच्या क्रमांकावर होता. १९९० ते २०१७ दरम्यान communicable म्हणजेच स्पर्शाने पसरणारे रोग आणि नवजात बाळांच्या संबंधित आजारांची प्रकरणे ४१ टक्क्यांनी कमी झाली आहेत. तर non-communicable म्हणजेच स्पर्शाने न होणाऱ्या आजारांमध्ये ४० टक्के वाढ झालेली बघायला मिळाली. वाढ झालेली ही आकडेवारी चिंताजनक आहे. 

भारतीय लोकसंख्येचा विचार करायचा तर १९९० च्या तुलनेत २०१७ मध्ये भारतातील लोक चांगल्या आरोग्यासोबत १० वर्ष जास्त जगत होते. १९९० मध्ये महिलांचा निरोगी जीवनकाळ हा ५० वर्ष होता, तो आता २०१७ मध्ये वाढून ५९ वर्ष झाला आहे. आणि पुरुषांचं सांगायचं तर १९९० मध्ये पुरुषांची हेल्दी लाइफ एक्सपेक्टेंसी म्हणजेच निरोगी जीवनकाळ ५१ वर्ष होता. तो आता २०१७ मध्ये वाढून ५९ वर्ष झाला आहे.  

ही आकडेवारी हेच सांगते की, जरी लोकांचा जीवन जगण्याचा कालावधी वाढला असेल, पण त्यांच्यांत वेगवेगळ्या आजारांचंही प्रमाण वाढलं आहे. अनेकजण फार कमी आयुष्य निरोगी जगत आहेत. महत्त्वाची बाब म्हणेज आरोग्याबाबत इतकी जागरुकता असूनही लोक आरोग्याकडे फार गांभिर्याने बघतातच असे दिसत नाही.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स