शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

भारतात प्रदूषणाची स्थिती गंभीर, ५ वर्षेही जगू शकत नाहीत एक लाख लहान मुलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 10:25 IST

जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे.

(Image Credit : Down To Earth)

जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसत आहे. अनेक जीवघेण्या आजारांचा धोका प्रदूषणामुळे होतो आहे. सीएसई(सेंटर ऑफ सायन्स अ‍ॅंन्ड एन्व्हायर्नमेंट) च्या एका रिपोर्टनुसार, देशात दरवर्षी १ लाख लहान मुलं प्रदूषित हवेमुळे पाच वर्षाच्या आतच जीव गमावत आहे. वायु प्रदूषणामुळे देशात ५ वयापेक्षा कमी वयाच्या दर १० हजार मुलांपैकी सरासरी ८ पेक्षा अधिक लहान मुलांचा मृत्यू होत आहे. मुलींमध्ये हे प्रमाण अधिक जास्त आहे. दरवर्षी दर १० हजार मुलींपैकी सरासरी ९ पेक्षा अधिक मुलींचा त्या पाच वर्षांच्या होण्याआधीच प्रदूषणामुळे मृत्यू होत आहे.

१५ ते १६ मिलियन इ-व्हेइकल आणण्याचं लक्ष्य

(Image Credit : medscape.com)

पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्वसंध्येला स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायर्नमेंट -२०१९ चा रिपोर्ट जाहीर करण्यात आला. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतात होणाऱ्या एकूण व्यक्तींचा मृत्युमध्ये प्रदूषणामुळे १२ टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू होतो आहे. हेच कारण आहे की, २०२० पर्यंत भारतात १५ ते १६ मिलियन इ-व्हेइकल आणण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे.

या राज्यांमध्ये सर्वात जास्त जलप्रदूषण

(Image Credit : Livemint)

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ८६ वॉटर बॉडीज गंभीर प्रदूषणाच्या जाळ्यात आहेत. यातील सर्वात जास्त जलप्रदूषण कर्नाटक, तेलंगणा आणि केरळमध्ये आहे. २०११ ते २०१८  दरम्यान या राज्यांमध्ये प्रदूषित इंडस्ट्रींची संख्या साधारण १३६ टक्क्यांनी वाढली आहे. २४ तास चालणारे पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये ३५ टक्के कमतरता आली आहे. भारताची मोठी समस्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये २२ राज्यांमध्ये ७९ मोठी आंदोलने घाण पसरवणाऱ्या लॅंडफिल साइट आणि डंप यार्डबाबत झाले आहेत. 

शाळांमध्ये मुलांचं आरोग्य धोक्यात

(Image Credit : Development News)

अनेक सर्व्हेंमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, जगभरात दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी आहे. याच राजधानीतील शाळा अधिकच प्रदूषित आहेत. नोव्हेंबर २०१८ पासून क्लीन एअर एशियाने शाळांमधील प्रदूषणावर अभ्यास केला. यात दिल्लीच्या भुवनेश्वर आणि नागपूरच्या शाळांचा समावेश करण्यात आला. टेरी स्कूल ऑफ अ‍ॅडव्हांस स्टडीजमध्ये आयोजित बीट एअर पलूशन वर्कशॉपमध्ये क्लीन एअर एशियाच्या प्रोजेक्ट अधिकारी प्रेरणा शर्मा यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये आम्ही हा रिसर्च केला होता. शाळांच्या आजूबाजूचं ट्रॅफिक प्रदूषण अधिक वाढवतं. काही शाळांमध्ये प्ले ग्राऊंड आणि बस पार्किंग जवळजवळ आहेत. अशात मुलं थेट प्रदूषणाच्या जाळ्यात येत आहेत. 

टॅग्स :Researchसंशोधनenvironmentवातावरणpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषण