शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जिल्ह्यात चार लाख मेट्रिक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज

By admin | Updated: December 1, 2014 22:55 IST

पावसाच्या लहरीपणामुळे यंदाचा खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरला. पावसाच्या खेळीमुळे यंदा खरिप हंगाम शेतकऱ्यांसाठी समाधानाचा नसला तरीही मागील वर्षाच्या तुलनेत अधिकचे

कृषी विभाग : पीक कापणी प्रयोगाचा आधार
कपिल केकत - गोंदिया
पावसाच्या लहरीपणामुळे यंदाचा खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरला. पावसाच्या खेळीमुळे यंदा खरिप हंगाम शेतकऱ्यांसाठी समाधानाचा नसला तरीही मागील वर्षाच्या तुलनेत अधिकचे उत्पादन देणारा राहणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कृषी विभागाने केलेल्या ३०० पैकी २१९ प्रयोगांत तीन लाख ३५ हजार मॅट्रीक टन उत्पादनाची शक्यता दिसून आली आहे. उर्वरीत ८१ प्रयोगांत उत्पादनाचे प्रमाण वाढणार असून सुमारे चार लाख मेट्रीक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.
धानाचे कोठार म्हणून गोंदिया जिल्ह्याची राज्यातच नाही तर देशपातळीवर ओळख आहे. येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक धान असून त्यामुळे जिल्ह्यात धानाची भरभराट असते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे ‘कभी खुशी-कभी गम’ च्या परिस्थितीचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागतो. यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना काही प्रमाणात डोकेदुखीचा सामना करावा लागला. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली व त्याचा परिणाम उत्पादनावरही जाणवण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
यंदा जिल्ह्यात एक लाख ८८ हजार ९७६ हेक्टर क्षेत्रात खरिपाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धान उत्पादनाच्या या घडामोडीवर लक्ष ठेवत कृषी विभाग येणाऱ्या उत्पादनाचा आढावा घेत राहते. विशेष म्हणजे कृषी विभागाचा संपूर्ण कारभार धानाऐवजी तांदळावर चालत असल्याने ते जिल्ह्यातील तांदळाच्या उत्पादनावर लक्ष लाऊन राहतात. यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कृषी विभाग, महसूल विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग पीक कापणी प्रयोग करतात.
या प्रयोगांत २७.३० क्विंटल दर हेक्टरी धानाचे तर १८.८४ क्विंटल दर हेक्टरी तांदळाचे उत्पादन होऊ शकते असा अंदाज दिसून आला आहे. या आधारे जिल्ह्याचे उत्पादन बघितल्यास तीन लाख ३५ हजार ३६० मेट्रीक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज बांधला जात आहे. ८१ प्रयोग अद्याप झालेले नसल्याने त्यांचा अंदाज धरल्यास यंदा जिल्ह्यात सुमारे चार लाख मेट्रीक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे खरिपाचा हंगाम हातून गेल्याचे शेतकरी बोलत आहेत. तर कृषी विभागाने चार लाख मेट्रिक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे आता खरे चित्र काय असणार ते प्रत्यक्षात उत्पादन हाती आल्यावरच स्पष्ट होणार आहे.