शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख निराधारांना आवास योजनेची प्रतीक्षा

By admin | Updated: November 4, 2014 22:41 IST

निराधारांंना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी हक्काचा निवारा देण्यासाठी शासनाकडे वेगवेगळ्या नावांनी निवारा योजना अस्तित्वात आणल्या. मात्र त्यावर खर्च करण्यासाठी निधीच हाती

अपूर्ण निधी : अनेकांचे संसार उघड्यावर, जनप्रतिनिधींचे प्रयत्न अपुरेयशवंत मानकर - आमगावनिराधारांंना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी हक्काचा निवारा देण्यासाठी शासनाकडे वेगवेगळ्या नावांनी निवारा योजना अस्तित्वात आणल्या. मात्र त्यावर खर्च करण्यासाठी निधीच हाती नसल्याने या योजना निराधारांंसाठी फक्त मृगजळ ठरत आहेत. संपूर्ण जिल्हाभरात निराधारांसाठी असलेल्या आवास योजना निधीअभावी रखडल्या असून गरिबांना निवाऱ्यांचा आधार मिळणे बंद झाले आहे.राज्य शासनाने नागरिकांना निवाऱ्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना, रमाई आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना तसेच वाजवी दरात हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडा योजना अस्तित्वात आणली. या योजनांच्याअंतर्गत दारिद्रय रेषेखालील नागरिकांना वाजवी दरात निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी सोय करण्यात आली. शासनाच्या सकारात्मक धोरणांमध्ये जिल्हा पातळीवर दारिद्रय रेषेखालील नागरिकांना मागणीनुसार निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनही करण्यात येत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात निवाऱ्यांची सोय गरिबांना होणे अपेक्षित होते. त्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमाने नोंदणीही करण्यात आली आहे. परंतु हक्काच्या निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात प्रशासन मागे पडले आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांचा संसार उघड्यावरच मांडलेला दिसत आहे. जिल्ह्यात १ लाख ४४ हजार १८६ नागरिक निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या इंदिरा गांधी आवास योजना, रमाई आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना यामध्ये निवारा मिळावा यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या माध्यमाने मागणी केली आहे. अनुसूचित जातीमधील १६ हजार ३५६, अनुसूचित जाती २१ हजार ४४८, अल्पसंख्याक ११८५, इतर ५७ हजार ६१८ व प्रलंबीत ४७ हजार ४७८ याप्रमाणे यादीतील इच्छुकांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. परंतु निधीअभावी ती यादीच मंजूर होत नाही. त्यामुळे हक्काचा निवारा असे अनेकांसाठी स्वप्नच ठरत आहे. जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेतील नागरिक आपले संसार उघड्यावर सजवत असून नैसर्गिक आपत्तीलाही या नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या गतीमान नैसर्गिक परिणामांना नागरिक बळी ुपडत आहेत. परंतु त्यांच्या जीवन जगण्याच्या दृष्टीकोणाला आपले करणारी पाऊलवाट अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. निवारा योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी मिळावा म्हणून जनप्रतिनिधींनी कधी शासनाकडे लढा दिला नाही. नागरिक दररोज प्रशासकीय कार्यालयांकडे निवारा मंजुर होणार काय? असा प्रश्न करीत पायपीट करीत आहेत. राज्यात नव्या दमाने सत्तारूढ झालेले शासन या गरीबांना हक्काचे निवारे मिळवून देण्यास समर्थ ठरेल का? आणि सत्तारूढ पक्षाचे येथील लोकप्रतिनिधी त्यासाठी जोर लावतील का? अशी प्रतिक्रिया उमटत आहे.