शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

वाजपेयींचे गोंदिया जिल्ह्याशी घनिष्ठ नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:02 PM

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. जनसंघाचे कार्यक्षेत्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे होते.

ठळक मुद्देजिल्ह्याला तीनदा भेट : कार्यकर्त्यांशी जुळली होती नाळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. जनसंघाचे कार्यक्षेत्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे होते. यामुळे भाजपाच्या अनेक नेत्यांची जिल्ह्यात तेव्हा रेलचेल होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गोंदिया जिल्ह्याला निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तीनदा भेट दिली. त्यांचे जिल्ह्यातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांशी घनिष्ठ नाते संबंध होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वच जण नि:शब्द झाले. अनेकांनी त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. कार्यकर्त्यांशी थेट नाड असणार नेता म्हणजे वाजपेयी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे १९७८ मध्ये निवडणूक प्रचारार्थ प्रथम गोंदिया येथे आले होते. त्यानंतर माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या निवडणूक प्रचारार्थ १९९१ आणि १९९६ मध्ये नारायणदास सराफ यांच्या प्रचारार्थ ते गोंदियाला आले होते. या वेळी गोंदिया येथील सध्याच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा झाली होती. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील अनेक भाजपाच्या जेष्ठ नेत्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. गोंदिया येथील विश्रामगृहात त्यांनी तेव्हा स्थानिक पत्रकार आणि भाजपा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. डॉ. राधेश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली होती. तर आमगाव येथील माजी खासदार महादेवराव शिवणकर यांच्या निवासस्थानी भेट देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. निवडणूक प्रचारार्थ त्यांची जिल्ह्यात झालेली भाषणे अद्यापही जिल्हावासीयांच्या स्मरणात आहेत. भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयी यांच्या योगदानामुळेच भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला. गोरगरीब, शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.मौत की उमर क्या हैदो पल भी नहीजिंदगी का सिल सिलाआज है कल नहीया कवितेच्या चार ओळी आजही जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या स्मरणात आहेत. यावरुन त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची कार्यकर्त्यांवर किती छाप होती हे दिसून येते. अटलबिहारी वाजपेयी यांनी जिल्ह्याला केवळ तीनदा भेट दिली असली तरी या महान नेत्याच्या भेटीच्या आठवणी अद्यापही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आजही स्मरणात आहे. त्यामुळे त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांजवळ शब्द नव्हते. यावरुन या महान नेत्याचे कार्य कळत असल्याचे डॉ. राधेश्याम अग्रवाल (बबली) यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी