शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनारेश्वरालयात तुळशी विवाहाची अनोखी परंपरा

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

हिंदू संस्कृतीत तुळशीविवाह झाला की उपवर-वधूंचे लग्न जुळविण्याच्या कामांना सुरूवात केली जाते. त्यामुळे तुळशीविवाहाची वाट अनेक जण पाहात असतात. अंगणातील तुळस आणि भगवान

नामदेव हटवार ल्ल सालेकसाहिंदू संस्कृतीत तुळशीविवाह झाला की उपवर-वधूंचे लग्न जुळविण्याच्या कामांना सुरूवात केली जाते. त्यामुळे तुळशीविवाहाची वाट अनेक जण पाहात असतात. अंगणातील तुळस आणि भगवान कृष्णाचा विवाह लावण्याची ही परंपरा घरोघरी पाळल्या जाते. मात्र त्याला मर्यादित स्वरूप असते. फार तर शेजारच्या दोन-चार घरातील लोक वऱ्हाडी म्हणून या लग्नाला असतात. मात्र एखाद्या खरोखरच्या लग्नाला असावे अशा वऱ्हाड्यांच्या गराड्यात आणि लग्नाचे सर्व सोपस्कार केले जाणारा ‘तुळशी विवाह’ पहायला असेल तर हलबीटोल्यातील अर्धनारेश्वरालयात मंगळवारी जरूर या.श्रमदानातून साकारलेल्या सालेकसा तालुक्यातील अर्धनारेश्वरालय या ठिकाणी २००४ पासून अशा पद्धतीने तुळशी विवाह भव्य स्वरूपात पार पाडण्याची प्रथा सुरू करण्यात आली. गतवर्षी ९०० वऱ्हाड्यांच्या साक्षीने हा समारंभ झाला होता. यावर्षी एक हजार लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी खास विवाहपत्रिकाही छापण्यात आल्या आहेत. तालुक्यातील अनेक गावातील लोकांसह नागपूरपासून रायपूरपर्यंतच्या अनेक लोकांनाही यासाठी निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.तुळशी विवाहाच्या निमित्ताने मंडप टाकणे, परिसर सजविणे, येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे, आदरातिथ्य करणे ही सर्व कामे करण्यात येतात. येणाऱ्या प्रत्येकासाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात येते. आतषबाजी, बँडबाजा असे सर्वच इथे पहायला मिळते. तुळशी आणि शालिग्राम (श्रीकृष्णाचे शापित रूप) च्या रुपातील काळा दगड यांच्यात अंतरपाट ठेवून हा विवाह समारंभ लावल्या जातो. विवाहाच्यावेळी विधी पूर्वधक मंत्रपठण लांजी (ककोडी) येथील विश्वनाथ तिवारी महाराज पार पाडत असतात. मंगलाष्टकेही म्हटल्या जातात. मांडव सोन्याचा घातिला,किस्रदेव हा उभा राहिला हाती शोभे वरमालाअशी लग्नाची गाणीही वऱ्हाड्यांना ऐकायला मिळतात. त्यात तुळशीचे महत्व विषद करताना जिला नाही लेक, तिने तुळस लावावी,तिच्या दारी येई, गोविंद लेक-जावईअशी गीतेही ऐकायला मिळतात. तुळशी विवाहाचे महत्व सांगण्यासोबतच हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठीही जनजागृती केली जाते. एका बाजूला मुलगा हवा म्हणून स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत असताना कन्यादानाखेरीज जीवनाचे सार्थक नाही याचेही महत्व या ठिकाणी सांगितले जाते.