शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षापासून मिळत नाही तलावातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

भविष्यात शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार असल्याची भिती नवेगावबांधसह पाच गावातील निस्तार हक्क नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हे जर केल्या गेले नाही तर तलावाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भितीही व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगामापासून शेतकरी वंचीत । खोलीकरण करण्याची पाच गावांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील मालगुजारी तलावाची निर्मिती शेतीचे सिंचन व पिण्यासाठी पाणी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती. गेल्या ४५० वर्षापासून या तलावात लाखो टन गाळ साचला आहे. आतापर्यंत या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या वर्षी तलावात मृत साठाच उपलब्ध होता. त्यामुळे नवेगावबांध व परिसरातील गावात पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवले होते. गेल्या तीन वर्षापासून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे खरीप व रब्बी हंगामापासून शेतकरी वंचित राहिले आहेत. या माजी मालगुजारी तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी नवेगावबांधवासी व निस्तार हक्क पाच गावातील रहिवाशांनी ग्रामसभेतून केली आहे.येथील तलाव १८ व्या शतकात सात पर्वतांच्या मधल्याभागात कोलू उर्फ कवळू पाटील डोंगरवार यांनी सिंचनासाठी तयार केले होते. या तलावाच्या बांधकामाचे अपूर्ण राहिलेले काम नवेगावबांधचे मालगुजार व कवळू पाटलाचे पूत्र सिताराम पाटील डोंगरवार यांनी त्यांच्या निधनानंतर पूर्ण केले. हा तलाव ६२५ मीटर लांब व ११.६० मीटर उंचीचा आहे. उपयुक्त साठवण क्षमता २९.५९७ दलघमी आहे. या तलावाच गट क्रमांक १२९२ असून याची आराजी १२२७.६६ हेक्टर आर एवढी आहे. हा तलाव ४५० वर्षे पूर्वीचा असून १९५६ मध्ये मध्यप्रदेश शासनाकडून महाराष्टÑ शासनाला हस्तांतरीत करण्यात आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र ५६९८ हे.आर. असून १०००.३४ हे.आर. बुडीत क्षेत्र आहे. यापैकी ८२४ हेक्टर आर सध्या उपलब्ध क्षेत्र आहे. १७७० हेक्टर आर. लगतच्या जंगलातून या तलावात गाळ वाहून येत असतो. गेल्या शंभर वर्षांचाच जर विचार केला तर आजघडीला या जलाशयात चार लाख ४२ हजार ५०० घ.मी. गाळ साठला असावा, असा अंदाज गाळ तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.भविष्यात शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार असल्याची भिती नवेगावबांधसह पाच गावातील निस्तार हक्क नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हे जर केल्या गेले नाही तर तलावाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भितीही व्यक्त केली आहे. पाण्याच्या साठ्याबरोबरच येथील तलावाशेजारील पर्यटन संकुलाचा विकास होण्याचा प्रश्नही तेवढाच ज्वलंत आहे.वर्षानुवर्षापासून तलावात गाळ साचला असल्यामुळे तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील चार वर्षापासून या तलावातून कालव्याद्वारे पाण्याचा उपसा होत नसल्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकाला शेकडो शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा जबर आर्थिक फटका बसला आहे. नवेगावबांध व परिसरातील पाण्याच्या समस्येसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जैवविविधता समितीची स्थापना केली गेली. यात तक्रारकर्त्यांचाही समावेश होता. पर्यावरण व वन्यजीवांचा कुठलाही तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीला समितीत ठेवल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले गेले. पुन्हा तेच झाले. या समितीचा हेतूपुरस्सर आपल्याला हवा तसा अहवाल तयार करुन स्थानिक ग्रामवासीयांशी कसलीही चर्चा न करता सरपंच अनिरुद्ध शहारे बैठकीला नसताना देखील घाईगडबडीत त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली. नवेगावबांधसह पाच गावांच्या ग्रामसभेचा कोणताही ठराव नसताना त्यांच्याशी चर्चा न करता या पाच गावतील नागरिकांच्या निस्तार हक्कांचा विचार न करता तलावाचे खोलीकरण व पर्यटन संकुलात विकासकामे करण्यात येऊ नये असा अहवाल वन्यजीव व वनविभागाने तयार करुन तलावाला संरक्षीत क्षेत्र घोषित केले हे नियमबाह्य आहे, असा आरोप फाऊंडेशनने केला आहे.

टॅग्स :Waterपाणी