शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेली ५० टक्के बियाणे नष्ट

By admin | Updated: June 26, 2014 23:20 IST

तालुक्यात पावसाने पेरणीच्या वेळी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली बियाणे अंकुर लागण्याअगोदरच नष्ट झाली आहते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याशिवाय पर्याय नसून यामुळे

पावसाने फिरविली पाठ : बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट
आमगाव : तालुक्यात पावसाने पेरणीच्या वेळी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली बियाणे अंकुर लागण्याअगोदरच नष्ट झाली आहते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याशिवाय पर्याय नसून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यात उशिरा का होईना दोन दिवस पावसाने समाधानकारक हजेरी लावली व शेतकऱ्यांना पेरणीला वेळ मिळाला. शेतकऱ्यांनी शेतातील मशागत पूर्ण करुन बियाण्यांची लागवड करण्यास सुरुवात केली. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून बियाण्यांची लागवड केली. यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या जातीचे बियाणे खरेदी केले. दोन दिवस पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होता. परंतु बियाण्यांंची लागवड होऊन पंधरवडा संपला तरी पावसाने तालुक्यात हजेरी लावली नाही. त्यामुळे बळीराजाने पेरणी घातलेले भात बियाणे धान्य अंकुर निघण्याआधीच नष्ट झाले आहेत. अनेक शेतांमध्ये अंकुर निघाले परंतु पाण्याअभावी ते करपल्याचेही चित्र दिसून येत आहे. एकंदर पुन्हा एकदा अस्मानी संकटाच्या सापळ््यात शेतकरी अडकला आहे.
तालुक्यात पाऊस समाधानकारक पडेल असा तर्क शेतकऱ्यांनी लावला होते. परंतु तालुक्यात १ जून ते २५ जून या कालावधीत दोनच दिवस १२४.६ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद आहे. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी बियाण्यांची लागवड करून घेतली. परंतु पावसाने ऐनवेळी पाठ फिरविल्याने बळीराजाची फसगत झाली. शेतातील बियाणे पाण्याअभावी नष्ट झाली असून बळीराजा आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. (शहर प्रतिनिधी)