शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांचा अल्प प्रतिसाद

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

मानवी विकासात प्राथमिक शिक्षणाचे महत्व अधिक आहे. मानवी संस्काराची जळणघडण मुलांना प्राथमिक वयातच होणे गरजेचे आहे. याकडे शासनाने दूरदृष्टीपणे लक्ष देऊन शिक्षणाचा कायदा अंमलात आणला.

सालेकसा : मानवी विकासात प्राथमिक शिक्षणाचे महत्व अधिक आहे. मानवी संस्काराची जळणघडण मुलांना प्राथमिक वयातच होणे गरजेचे आहे. याकडे शासनाने दूरदृष्टीपणे लक्ष देऊन शिक्षणाचा कायदा अंमलात आणला. जिल्ह्यात गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पाला जिल्हा परिषदेने सुरू करून एका अभिनव उपक्रमाला सुरूवात केली. सध्या या योजनेचे तिसरे वर्ष सुरू आहे. मात्र या प्रकल्प योजनेला शाळा स्तरावर मुख्याध्यापकाकडून योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील १२० शाळांपैकी मोजक्याच शाळेत गावची शाळा आमची शाळा या उपक्रमांतर्गत कार्यक्रम राबवित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वागिण विकास होणार काय? असा पालक वर्गाला प्रश्न पडलेला आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनेत विद्यार्थी पालक व शिक्षकांचा सहभागाने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न चालविण्यात आली. या योजनेत अनेक उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आठही तालुक्यात सहयोगी तत्वावर विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाकरिता गावची शाळा आमची शाळा या शैक्षणिक गुणवत्ता वाढ प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. या प्रकल्प योजनेत जिल्ह्यातील उर्वरित सात तालुके सोडल्यास सालेकसा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२० शाळा या योजनेत सहभागी आहेत. मात्र या शाळामधून मोजक्याच शाळा प्रभावीपणे कार्यरत आहे. उर्वरीत शाळामधील मुख्याध्यापकांनी या योजनेच्या तपशिलवार माहितीलाच खो दिला आहे. गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पात लोक सहभागातून विद्यार्थी व शाळांची गुणवत्ता वाढ ध्येयपूर्तीसाठी शासन स्तरावरून जिल्ह्याला प्रोत्साहन देण्यात आले. यात लोक सहभाग शाळेतील पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा, सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट्यपूर्ती, या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास साधण्याचे ध्येय शासनाकडून केले जात आहे. मात्र शासनाच्या सर्वागिण विकासाच्या योजनेला तालुक्यातील मुख्याध्यापकांनी प्रभावीपणे राबविता विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाला पाठ दाखविली आहे. त्यामुळे योजना पदरी पडूनही प्रभावीपणे शाळांमध्ये अंमलबजावणी होत नाही याला मुख्याध्यापकांची मानसिकता असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)