शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळांत अग्निशमन यंत्रच नाहीत

By admin | Updated: November 8, 2014 22:39 IST

शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. शाळा इमारतीच्या परिसरात

पांढरी : शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. शाळा इमारतीच्या परिसरात ज्वलनशिल पदार्थ ठेवण्यावर प्रतिबंध लावला होता. परंतु तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही एकाही शाळेत अग्निशमन यंत्राची व्यवस्था करण्यात आलेली नाही.सुरक्षेच्या या अनास्थेमुळे शाळा व्यवस्थापकाव्दारे शासनाच्या निर्देशाची अवहेलना होत आहे. तसेच प्रशासनाव्दारेही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासनाच्या निर्देशनुसार, नवीन शाळांच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत: सुरक्षेचे मापदंड लक्षात घेवून केले जाते. तसेच नॅशनल बिल्डींग उपायाचे निरीक्षण करून तसे प्रमाणपत्र होणे गरजेचे असते. सर्व शाळांत अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण कमीत कमी दोन व्यक्तींना असावे व अग्निशमन यंत्राजवळ त्या व्यक्तीचे नाव स्पष्ट अक्षरात लिहीलेले असावे. तसेच सर्व शाळांत प्रथमोपचार पेटी ठेवण्यात यावी, गट शिक्षणाधिकाऱ्याव्दारे प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जावे, पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसाठी मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांना जबाबदार ठरविण्यात यावे अशा तरतुदी आहेत. शासनाच्या निर्देशानुसार बालवाडी व पूर्व माध्यमिक शाळा इमारतीच्या खालच्या मजल्यावर असायला हवी. मात्र शासनाव्दारे जाहीर दिशानिर्देशाचे पालन जिल्ह्यात कुठेही होत असल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात एकूण १ हजार ७० प्राथमिक, २९८ उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय ३९ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व २५ ते ३० महाविद्यालये आहेत. या सर्व शाळेत आगीपासून वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक शाळेत अग्निशमन यंत्र तर दूर, प्रथमोपचार पेटीसुध्दा उपलब्ध नाही. शासनाच्या आदेशाची शाळा प्रशासनाव्दारे उपेक्षाच केली जात आहे. असे असतानाही शिक्षण विभागाव्दारे अद्यापही कोणत्याही शाळा प्रशासनावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या शाळा इमारतीचे बांधकामही शासनाव्दारे देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून केले जात नाही. शाळा व्यवस्थापनाकडून प्रशासनाची दिशाभूल केली जात असून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ केला जात आहे. (वार्ताहर)