शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

योजना उठली शेतकऱ्यांच्या जीवावर

By admin | Updated: February 5, 2016 01:21 IST

परिसरातील शेतीला सिंचनाची व्यवस्था निर्माण करुन देण्यासाठी शासनाच्या नियंत्रणाखाली रजेगाव -काटी उपसा...

रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना : न्यायासाठी संघर्ष समितीची धडपड रावणवाडी : परिसरातील शेतीला सिंचनाची व्यवस्था निर्माण करुन देण्यासाठी शासनाच्या नियंत्रणाखाली रजेगाव -काटी उपसा सिंचन योजना अनेक वर्षापासून कार्यान्वित होत आहे. या योजनेचे क्रियान्वयन मध्यम प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून होत आहे. परंतु या विभागाने केंद्र आणि राज्य शासनाचा ठराविक नियम कायद्याचे तंतोतंत पालन न करताच जमीन संपादन प्रक्रिया कशी पार पाडली, अशा प्रश्न किसान संघर्ष समितीद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. योजना साकारल्यास परिसरात हरितक्रांती येणार असे स्वप्न दाखविण्यात आले. योजनेसाठी शेतकऱ्यांच्या मालकीतील शेती कालव्याकरिता घेण्यासाठी सारे नियम धाब्यावर बसवत सक्तीने शेतकऱ्यांकडून जमिनी बळकावल्या आहेत. प्रकल्पासाठी लागणारी जमीन अमानुषतेचा कळस गाठत जबरदस्तीने शेतकऱ्याकडून घेतली आहे. हे जर कायद्याचे राज्य आहे असे म्हणत असू तर मग जमीनी संपादित करत असताना कायदे कुठे जातात. प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी कवडीमोल भावात जाणार त्या शेतकऱ्यांचा विरोध असणे साहजिकच आहे. परंतु या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध का आहे, नेमका कशासाठी आणि कोणत्या गोष्टीला आहे, शेतकऱ्यांचे नेमके म्हणणे काय आहे अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सरकारने दिली पाहिजे.पुनर्वसन आणि मोबदल्या बाबदचा प्रामाणिकपणा दाखवला तर शेतकऱ्यांचा विरोध बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. ही योजना एकच असून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दोन प्रकारे देण्यात येत आहे. एका शेतकऱ्याला अवाढव्य तर लागूनच असलेल्या शेतकऱ्याला अत्यल्प तर लगतच असलेल्या शेतकऱ्याला अत्यल्प मोबदला दिले जात असल्यामुळे शेतकऱ्यांत कमालीचा असंतोष खदखदत आहे. परंतु शेतकऱ्यांचे हित पाहण्यापेक्षा लोकसेवकांच्या हिताला अधिक लक्ष दिले जात आहे, असे किसान संघर्ष समितीचे म्हणणे आहे. योजनेत समाविष्ट सर्वच शेतकऱ्यांना एक सारखा समान मोबदला दिला जावा अशा मागणीला जोर आला आहे. गोरगरीब नागरिकांनी शासनाच्या वितभर जागेवर उदरनिर्वाहा करीता अतिक्रमण केले तर लगेच प्रशासनाचे आला अधिकारी त्यावर त्वरित कार्यवाही करुन त्यांना अपमानित करुन कोर्टात खेचण्याचा धमक्या देतात. एवढेच नाही तर केवळ वित भर जागे करिता त्यांना शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या सतत झिझवाव्या लागतात. मात्र शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अमलदारांनी गैर कृत्य करीत शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान केले आहे. त्यांच्या या कृत्याला हलगर्जीपणा म्हणावा की, प्रशासनाच्या कामकाजाचा एक नमुना अशा प्रश्न बाधित शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.योजनेच्या सुरुवातीच्या काळापासूनच पाटबंधारे विभागाने खोटारडी चुकीची माहिती एकत्रित करुन संबंधित विभागाला पुरविली. प्राप्त झालेली माहिती खरी आहे की, पूर्ण चुकीची याबाबत काहीच पडताळणी न करताच संबंधित विभागाने भुसंपादनाची प्रक्रिया पार पाडली. त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. कायद्याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या कायदेशिर हक्काला कसल्याच प्रकारचे महत्व दिलेच नाही. संपादनाची प्रक्रिया पूर्णत: नियमबाह्य झाली असल्यामुळे वर्तमान राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिर पणे उभे आहे अशा घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे घडलेल्या संपूर्ण गैर कृत्याची माहिती शासनासमक्ष न्याय प्राप्तीसाठी तक्रार किसान संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे. (वार्ताहर)