शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोदय तीन ‘आर’वर आधारित- बालभाई

By admin | Updated: November 17, 2014 22:59 IST

सर्वोदय हा तीन ‘आर’वर आधारित आहे. यात रिलीफ, रिफार्म आणि रिव्हॉल्यूशन हा सर्वोदयी मंत्र सांगितला आहे. तसेच हे विचार पाच तत्वावर आधारीत असून पहिला आंतरमन शुद्धी जी प्रार्थनेतून होते

मित्र मिलनचा समारोप : तीन दिवसात कृषी, शिक्षण, स्त्री शक्तीवर विस्तृत चर्चापवनार : सर्वोदय हा तीन ‘आर’वर आधारित आहे. यात रिलीफ, रिफार्म आणि रिव्हॉल्यूशन हा सर्वोदयी मंत्र सांगितला आहे. तसेच हे विचार पाच तत्वावर आधारीत असून पहिला आंतरमन शुद्धी जी प्रार्थनेतून होते बर्हिमन शुद्धी जी साफ सफाईतून होते. श्रम ज्यामुळे आरोग्य चांगले व आहाराची व्यवस्था होते. शांती ज्यामुळे अशांती संपते तर पाचवे समर्पन ज्यामुळे आत्मशुद्धी मिळते, असे विचार मित्र मिलन सोहळ्याच्या अंतिम सत्रात बालभाई यांनी उपस्थितांसमोर मांडले. येथील विनोबा भावे आश्रमात आयोजित मित्र मिलन संमेलनाचा सोमवारी समारोप झाला. १५, १६, व १७ नोव्हेबर अशा तीन दिवस असलेल्या या संमेलनात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. दरवर्षी आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी निमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या संमेलनाला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त सर्वोदय मंडळी आपली उपस्थिती दर्शवून सर्वोदय विचार प्रचार-प्रसार करीत असतात.मित्र मिलनचा समारोप करताना कालिंदी दीदी यांनी बलुतेदारीवर माहिती दिली. गत काळात बलुतेदारीवरून गावाची तुलना व्हायची. जर गावात चार बलुतेदार असतील तर गाव छोटे व आठ असतील तर मध्यम व १२ असतील तर मोठे गाव तसेच त्याची शेती असेल तो मालक जरी असला तरी त्याच्या उत्पन्नाचा तो एकटाच वाटेकरी नव्हती. गावात राहणारे न्हावी, धोबी, कुंभार, सुतार हे सर्व त्याच्या उत्पन्नाचे काही प्रमाणात भागीदार असायचे. अर्थात सर्व व्यवहार जरी कांचन मुक्त असले तरी व्यवहार मात्र सुरळीत व्हायचे. सृष्टीमध्ये सौंदर्य व समाजामध्ये सौजन्य राहिल्यास हे जग किती सुुंदर होईल, असे त्या म्हणाल्या. स्त्री शक्ती ही अदृष्य असून ती जर जागृत झाली तर क्रांती घडू शकते, हे त्यांनी उदाहरणासह समजावून सांगितले. यासह या तीन दिवसात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील सर्वोदयी मंडळाचे सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले होते.शिला दीदी यांनी संमेलनात सहभागी सर्व सर्वोदयी विचारांचे आभार मानले. या संमेलनाला नारायण देसाई, अमरभाई, अशोक बंग, महेंद्र भट, मोहनभाई, रमेशभाई, वसंतभाई, सुब्बाराव, सुभाष वाळेकर, वसंत फुटाणे, बाळभाई, बालविजय, कांचनताई, रेखाताई, ज्योतीबहण, गौतमभाई, मिनूताई, गंगाताई यांनी आपली उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केली. देश विदेशातून शेकडो सर्वोदयांनी या संमेलनाला हजेरी लावली.(वार्ताहर)