शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जनधनचे पैसे परत जाणार अफवेने बँकेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे गोरगरिबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहे. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खाते उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये जमा करण्यात येणार आहे. यातंर्गत एप्रिल महिन्याची रक्कम बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे गोरगरिबांच्या चुली पेटणे कठीण झाले आहे. बाहेर रोजगार नसल्याने पैसा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत शासनस्तरावर महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये जमा करण्यात आले. परंतु कुणीतरी अफवा पसरविली की जनधन खात्यातील रक्कम परत जाणार म्हणून मंगळवारी (दि.७) महिलांनी बँकेत एकच गर्दी केली होती. यामुळे बँक कर्मचारी आणि पोलिसांची सुध्दा चांगलीच दमछाक झाली.लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे गोरगरिबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहे. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खाते उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये जमा करण्यात येणार आहे. यातंर्गत एप्रिल महिन्याची रक्कम बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे. खातेदारांची गर्दी टाळण्यासाठी बँकेच्या वेळापत्रकानुसार खातेदारांना रक्कम काढता येईल. बँकेत गर्दी करू नये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. अशातच ५ व ६ एप्रिलला सुट्टी असल्याने बँकेचे व्यवहार बंद होते. याच दरम्यान कुणीतरी अफवा पसरविली की जनधन खात्यातील रक्कम परत जाणार आहे. या अफवेने बँक परिसरात गर्दी उसळली होती. तसेच कुणी संजय गांधी निराधार योजनेचे, तर कुणी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे काढण्यासाठी मंगळवारी बँकेत गर्दी केली होती. यामुळे बँकेच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. भर उन्हात पैसे परत जाणार या अफवेने गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहयला मिळाले. गर्दी नियंत्रीत करण्यासाठी बँक कर्मचारी व पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. भारतीय स्टेट बँकचे प्रभारी व्यवस्थापक चंद्रशेखर सुखदेवे, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक एस.बी.बोरकर यांनी सांगितले जनधन योजनेच्या लाभार्थ्यांनी अफवांना बळी पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जनधन योजनेतील ज्यांचा खात्यावर जमा झालेली रक्कम त्यांना मिळेल असे लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना