शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीची मशाल राणी अवंतीबाई लोधी

By admin | Updated: March 20, 2015 00:55 IST

सन १८५७ मध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागात काही क्रांतीविरांनी इंग्रजांना देशाबाहेर काढण्यासाठी एल्गार पुकारला.

विजय मानकर/राजकुमार बसोने सालेकसासन १८५७ मध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागात काही क्रांतीविरांनी इंग्रजांना देशाबाहेर काढण्यासाठी एल्गार पुकारला. यामध्ये एक क्रांतीची मशाल होती ती म्हणजे रामगढ येथील राणी अवंतीबाई लोथी. विरांगणा अवंतीबाईने इंग्रजांशी केलेले युद्ध देशवासियांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करीत आहे.विलक्षण बुद्धीमत्ता, अविस्मरणीय शौर्य, पराक्रम आणि कर्मठ व्यक्तिमत्वाच्या प्रतिक अवंतीबाई लोधी यांचा जन्म १६ आॅगस्ट १८३१ मध्ये मध्यप्रदेशच्या शिवनी जिल्ह्यातील मनकोहळी या गावी राव जुझांरुसिंह आणि सुमित्रा या दाम्पत्याच्या घरी झाला. बालपणापासूनच अश्वारोहण, तलवार चालविणे, धनुष्यबाणाने नेहमी लक्ष्य भेदने या कामात विशेष रस घेत सैनिकी शिक्षण घेण्याकडेही त्यांचा कल राहिला. १७ वर्षाच्या वयातच प्रौढ वयाचे रामगड येथील राजा विक्रमजितसिंह यांच्याशी त्यांचा विवाह करण्यात आला. या काळात इंग्रजांनी देशातील अनेक प्रांतावर आपली सत्ता स्थापित केली होती. पुढचे लक्ष्य त्यांनी रामगडला बनविले होते. यासाठी त्यांनी आपला डाव खेळीत राजा विक्रमजितसिंह याला वेडा घोषित केले आणि रामगड येथे कोर्ट आॅफ रेजीमेंट कायम करुन इंग्रजी कंपनीची एक रेजीमेंंट ठेवू लागले. परंतु अवंतीबाईने सत्तेची सुत्रे आपल्या हाती घेत रामगडचे शासन यशस्वीरित्या चालवू लागल्या. त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला. १८५७ मध्ये मे महिन्यात राजा विक्रमजितसिंह यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांनी इंग्रजांना रामगडच नाही तर संपूर्ण देशातून हद्द पार करण्याचा संकल्प केला व त्या दिशेने पाऊल टाकने सुरु केले. राणीने मध्य भारतातील विविध प्रांताचे राजे, सरंजाम, जहागिरदार, रियासतदार यांच्याकडे आपले दूत पाठविले व इंग्रजांविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले.इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी नव्या दमाने मैदानात या नाहीतर बांगड्या घालून घरी बसून रहा, असे संदेश त्यांनी पाठविले. ते वाचून अनेकांचे रक्त खळवळले. शंकरशाह आणि रघुनाथसिंह या संगीतकारांनी आपल्या संगीताच्या व कवी संमेलनाच्या माध्यमातून राणीचे संदेश गावागावात पोहचविण्याचे काम सुरू केले, परंतु इंग्रजांच्या गुप्तचरांना याची खबर मिळताच त्या दोघांना गोळ्या घालून यमसदनी पाठविले. यामुळे राणी क्रोधीत झाल्या, त्यांनी मंडला येथील डेप्युटी कमिश्नर वाडिंगटन यांच्या मुख्यालयावर हल्ला चढविला. वाडिंगटनला मृत्यूच्या घशात जाताना पाहून त्यांनी हिंदुस्तानी सैनिकांकडे जीवनदान मागीतले. त्यावर राणीने त्यांना अभयदान दिले. परंतु हेच अभयदान राणीला महागात पडले. काही दिवसातच वाडिंगटन यांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी सैनिकांसह रामगडवर हल्ला केला. शेवटी इंग्रजी सेना आणि राणी अवंतीबाई यांच्यात युद्धाची सुरवात झाली. पण राणी त्यांच्या हाती येत नव्हती. शेवटी अवंतीबाईच्या मंत्र्यांनी गद्दारी करीत इंग्रजांना गुप्त माहिती दिली व राणीला इंग्रजांनी चारही बाजूने घेरुन टाकले. शेवटी मृत्यू समोर बघून त्यांनी आपले सेनापती उमरावसिंह यांची तलवार मागून स्वत:च्या हाताने इहलोकाची यात्रा संपविली. शेवटी वाडिंगटननेही राणीच्या विरगतीला सलाम केला. तो दिवस होता २० मार्च १८५७. राणी अवंतीबाई अखेरचा श्वास घेत इंग्रजांना म्हणाल्या, या क्रांतीची मी एकटी जवाबदार असून राज्याच्या जनतेला व सैनिकांना व इतर जागिरदारांना दंड देवू नये, असे म्हणत त्या चिरनिद्रेत गेल्या. अशा विरांगणेचे कार्य सतत प्रेरणा देत राहणार.