शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

धापेवाड्यातून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

By admin | Updated: May 4, 2016 02:54 IST

धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या गावातील नागरीकांना या योजनेतून

पालकमंत्री बडोले : अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्देशगोंदिया : धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या गावातील नागरीकांना या योजनेतून पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करावा. या योजनेतून उद्योगाला पाणी देण्यापेक्षा पिण्याच्या पाण्याला संबंधित विभागाने प्राधान्य द्यावे, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात या संबंधाने आयोजित बैठकीत पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी आ.विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यासतवार, तिरोडाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मिहरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.पालकमंत्री यावेळी म्हणाले, जिल्हाधिकारी व धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर एकत्र बसून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन करावे. या योजनेवर ज्या गावांचा पाणीपुरवठा आहे त्या गावांना पाणीपुरवठा नियमित झाला पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात धापेवाडा प्रकल्पात पिण्याचे पाणी असताना संबंधित गावातील महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची वेळ येणार नाही, याकडे संबंधित विभागाने लक्ष दयावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून अदानी प्रकल्पासाठी पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी आल्याचे आमदार विजय रहांगडाले यावेळी म्हणाले. धापेवाडात शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठीच हे पाणी उपलब्ध करुन द्यावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता यासटवार यांनी धापेवाडा प्रकल्पात केवळ २ टक्के पिण्याचे पाणी आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळ्याच्या दिवसात अदानी प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यात येणार नसून २७ एप्रिल रोजीच अदानी प्रकल्पाचा पाणीपुरवठा बंद केल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)- तर उद्भवणार राज्यात वीज संकट४अदानी वीज प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण धापेवाडात जलसंकट निर्माण झाल्यामुळे बावनथडी प्रकल्पातील पाणी धापेवाडा प्रकल्पासाठी सोडण्यासाठी वीजमंत्र्यांसह राज्य सरकारमधील वरिष्ठ लोक प्रयत्नशील असल्याचे कळते. मात्र हे पाणी धापेवाड्यात पोहोचण्यासाठी काही दिवस लागतात. त्यामुळे तातडीने सरकारने पावले उचलली नाही तर अदानी प्रकल्पाला पाणी उपलब्ध होईपर्यंत दोन युनिट बंद ठेवावे लागतील. त्यामुळे राज्यात १२०० मेगावॅट वीजेचा तुटवडा निर्माण होऊन सर्वत्र भारनियमन सुरू होणार आहे. आधीच उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढली असताना हे संभाव्य वीजसंकट नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार आहे.धापेवाडाच्या अधिकाऱ्यांचे दुटप्पी धोरण?४दरम्यान धापेवाडा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी एकीकडे पाणी घेणे थांबविण्यासंदर्भातील अदानी व्यवस्थापनाला पत्र दिल्याचे सांगितले तर दुसरीकडे पाणी देणे सुरूच ठेवले, अशा आशयाची तक्रार जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी करून यासाठी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यासटवार हेच जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. यासंदर्भात कार्य.अभियंता यासटवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.