शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या प्रवाशांत नाराजीचा सूर

By admin | Updated: December 21, 2015 01:50 IST

रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवास भाड्यात दरवाढ केल्याने रेल्वेच्या प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

आॅटोच्या प्रवासाला पसंती : दरवाढीमुळे रेल्वे प्रवासी संख्या रोडावलीबाराभाटी : रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवास भाड्यात दरवाढ केल्याने रेल्वेच्या प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. परिसरातील रेल्वे स्थानकांतून कमी अंतराचा प्रवास करणारे प्रवासी आता आॅटोच्या प्रवासाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे आॅटोवाल्यांना सुगीचे दिवस आले असून रेल्वेचे प्रवासी रोडावत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.मानवाच्या प्राथमिक गरजाप्रमाणेच दुय्यम गरजासुद्धा अधिक महत्त्वाच्याच आहेत. मनोरंजनाची साधने, चैनीच्या वस्तू व दळणवळणाची साधने आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. मनुष्य सायकल, दुचाकी, चारचाकी, एसटी बस, रेल्वे, आॅटो आदींचा वापर प्रवासासाठी करतो. पण अशातच रेल्वे विभागाने प्रवाशांच्या तिकीट भाड्यात दरवाढ केल्याने कमी अंतराचा प्रवास करणारे आता आॅटोमध्ये गर्दी करू लागले आहेत. याचा विपरित परिमाण रेल्वेच्या उत्पन्नावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेने कर्मचारी, विद्यार्थी व इतर प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र काही महिन्यांच्या कालावधीत रेल्वे विभागाने पाच रूपये भाड्याचे सरळ दहा रूपये दरवाढ करून रेल्वे प्रवाशांना चिंतातूर करून सोडले आहे. त्यामुळे हेच प्रवासी आता आपल्या वेळेप्रमाणे व सोयीनुसार आरामात आॅटोने प्रवास करण्याचे धाडस करीत आहेत. परिसरातील अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध व कोहमारा मार्गावर चालणाऱ्या आॅटोंमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. क्षुल्लक चिल्लरच्या कारणावरून रेल्वेने प्रवाशांच्या मनावर आर्थिक ताण निर्माण केल्याचे बोलले जात आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर या दरवाढीचे काय नियोजन असावे, हे रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व रेल्वे मंत्र्यांनाच ठावूक. मात्र सामान्य प्रवाशांवर याचा मोठाच आर्थिक ताण बसत आहे. आता याचाच लाभ आॅटोवाले घेत आहेत. आॅटोचालक १० प्रवाशांऐवजी १८ ते २० प्रवाशांना कोंबून बसायला जागा नसतानाही प्रवास करायला भाग पाडत आहेत. त्यामुळे रेल्वेचा हिरवा कंदील आता आॅटो चालकांना मिळाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.रेल्वेच्या प्रवासाला सुखाचा व सुरक्षिततेचा प्रवास समजला जातो. परंतु येथे रेल्वेची दरवाढ झाल्याने रेल्वेच्या प्रवाशी संख्येमध्ये घट झाल्याचे परिसरातील रेल्वे स्थानकांच्या निरीक्षणातून दिसून येत आहे. दूरच्या अंतराचे भाडेवाढ न होता कमी अंतराची दरवाढ झाल्याने रेल्वेचे प्रवासी नाराज व्यक्त करीत आहेत. रेल्वे विभागाने दर कमी करून प्रवासाला सहकार्य करावे, असे अनेक प्रवासी बोलून दाखवित आहेत.(वार्ताहर)आॅटोचालकांना आले सुगीचे दिवसरेल्वेने कमी अंतराच्या प्रवास दरात वाढ केली. त्यामुळे अप-डाऊन करणारे कर्मचारी, किरकोळ सामान-साहित्य खरेदी विक्रीसाठी ये-जा करणारे लघु व्यावसायिक आता आॅटोने प्रवास करून आपल्या दळणवळणाच्या समस्येचा समाधान करीत आहेत. याचा लाभ आॅटोचालक करून घेत आहेत. तब्बल दुप्पट प्रवासी कोंबून नेले जात आहेत. आॅटो चालक अधिक लोभापायी क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरून प्रवाशांची कोंडी करीत आहेत. काळी-पिवळीमध्ये तर २० ते २२ प्रवाशांना कोंबून नेले जात आहे. या प्रकारामुळे अपघाताची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. तरी हे प्रवासी आता आॅटोच्या प्रवासालाच पसंती देताना दिसतात.