शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

दोन महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 5:00 AM

यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आला आहे. अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, सालेकसा,तिरोडा या तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा : गेल्या २४ तासात ३२२.२० मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याने गुरूवारपासून जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. गुरूवारी (दि.६) पावसाने गोंदिया, आमगाव, गोरेगाव तालुक्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावली होती. गेल्या २४ तासात सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड आणि सडक अर्जुनी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.ऑगस्ट महिन्याला सुरूवात होवून सात दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी जिल्ह्यातील १ लाख हेक्टरवरील रोवणी खोळंबली आहे. तर पºहे सुध्दा वाळत असल्याचे चित्र काही भागात आहे. धानाची रोवणी करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंतचा कालावधी अनुकुल मानला जातो.मात्र यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आला आहे. अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, सालेकसा,तिरोडा या तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे खरिपातील धान पिकांवर अद्यापही संकट कायम आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सकड अर्जुनी तालुक्यातील सौदंड महसूल मंडळात ६५.२० मिमी आणि सडक अर्जुनी महसूल मंडळात ७० मिमी पाऊस झाल्याने या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गुरूवारी सुध्दा सडक अर्जुनी, गोरेगाव, आमगाव या तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने या भागातील रोवणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र उर्वरित भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यतायंदा आॅगस्ट महिन्याला सुरूवात झाली तरी रोवणीची कामे आटोपलेली नाही. अद्यापही जिल्ह्यातील ५० टक्के रोवणी शिल्लक आहे. पावसाला विलंब होत असल्याने रोवणीचा अनुकुल कालावधी निघून जात आहे.त्यामुळे रोवणीच्या कामाला विलंब होत असल्याने याचा धानाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात मागील २४ तासात पडलेला पाऊसजिल्ह्यात मागील २४ तासात आठही तालुक्यात एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया ७ मिमी, गोरेगाव २.८० मिमी, तिरोडा ६७.४० मिमी, अर्जुनी मोरगाव २२.२० मिमी, देवरी ६४ मिमी, आमगाव ८.८० मिमी, सालेकसा ६.८० मिमी, सडक अर्जुनी १४३.२० मिमी अशा एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर