शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाची पालकांशी अपमानास्पद वागणूक

By admin | Updated: December 20, 2015 01:54 IST

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अत्री येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या मनमर्जीने शासन....

 आरोप : व्यवस्थापन समिती केली गठितपरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अत्री येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या मनमर्जीने शासन नियमांची पायमल्ली केली. हिटलरशाहीने १० महिन्याचा कार्यकाल लोटूनही शाळा व्यवस्थापन समिती गठित केली नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकाशी अपमानस्पद वागणूक केल्याची बाब पुढे आली आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये शाळा समिती गठित करण्यात आली होती. तिचा कार्यकाल २०१५ फेब्रुवारी होता. दोन वर्षाची मुदत असल्याने जानेवारीमध्ये पालक सभा घेऊन नवीन समिती गठित करणे बंधनकारक होते. पण मुख्याध्यापक व शाळा समितीचे अध्यक्ष यांची साठगाठ असल्याने समिती गठित न करता जुन्याच समितीची पुनर्नियुक्ती करून कार्यकाल वाढवून दिला. हे सर्व नियमबाह्य असून लाखो रूपयांचा आर्थिक व्यवहारही यात झाला आहे.शाळेत व्यायामशाळा, क्रीडांगण सपाटीकरण, वर्गखोलीचे काम समितीमार्फत करण्यात येत असल्याने समितीचा दर्जा व अध्यक्षांच्या सहीने आर्थिक व्यवहार होत असल्याने समितीला अधिक महत्व आले आहे. पालकांनी आक्षेप घेतला असता मुख्याध्यापक अंबुले यांनी ११ डिसेंबर रोजी पालक सभा समिती गठित करण्यासाठी बोलावली. पालकही सभेत आले. पण मुख्याध्यापकाने सत्ताधारी अध्यक्षांच्या दबावाखाली येवून समिती गठित केली नाही. उलट पालकाशी असभ्य वागणूक करून सभा न घेता तुम्हाला वाटेल ते करा, माझा कोणी काहीच करू शकत नाही, अधिकारी व नेते माझे आहेत, तुम्ही घरी जाऊ शकता, मला वाटेल ते करीन, असे म्हणत शाळेतून पसार झाले. गावात मुख्याध्यापक अंबुले यांच्याविरूध्द तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षक गावात राजकारण करत असून शिक्षणाचे धडे न शिकवता विद्यार्थ्यांना आता मुख्याध्यापक पालकांना राजकारणाचे धडे शिकवित आहे. आता पालकांनी आपली मुले शाळेत न पाठविण्याचा व शाळा बंद करण्याचा पवित्रा घेतल्याचे निलकंठ परिहार, ज्ञानेश्वर बिसेन, राजेश परिहार, बिजेवार व अन्य ५८ पालकांनी सांगितले. मुख्याध्यापक अंबुले व अध्यक्ष बिसेन यांची साठगाठ व समितीला विश्वासात न घेता दहा लाखांच्या जवळपास आर्थिक कामे करून इमारत, क्रीडांगण, व्यायामशाळेच्या कामात भ्रष्टाचार केला आहे. त्याचे पितळ उघडे होऊ नये म्हणून नवीन समिती गठित करण्यात आली नाही, असे पालकांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले. सदर मुख्याध्यापक व अध्यक्षावर कारवाई करण्याची मागणी पालकवर्ग गावकऱ्यांनी केली आहे. मुख्याध्यापक अंबुले यांच्याशी संपर्क केला असता समितीचा कार्यकाल संपला असून त्यात आपली चूक झाली. पण समिती ११ डिसेंबर रोजी सरपंच नसल्याने व गावकऱ्यांच्या गदारोळामुळे झाली नाही. यात भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार नसल्याचे सांगितले. अंबुले, सरपंच माहुरे यांच्याशी संपर्क केला असता मुख्याध्यापक यांनी समितीबद्दल पालकांची सभा घेण्याचे नोटीस दिले. पण हेतुपुरस्कर मुख्याध्यापकांनी सभा पूर्ण होवू दिली नाही. (वार्ताहर)