शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शासनाने ‘लॉकडाऊन’ व संचारबंदीची घोषणा केली आहे. नागरिकांच्या काळजी पोटी असून कोणीही घराबाहेर पडू नये अशी प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देवूनही कोरोना विषाणू संदर्भात नागरिकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. विनाकारण गावात फिरण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.

ठळक मुद्देदीपक जाधव : फिरणाऱ्यांवर आता पोलीस कारवाई केली जाणार

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : देशात कोरोना विषाणूच्या महामारीने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविण्यात आले आहे. नागरिकांकडून ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून पोलीस विभाग आपला जीव धोक्यात घालून कार्य करीत आहे. यामुळे नागरिकांनी स्वत:ची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी व घरात राहूनच कोरोना संसर्गाची लढाई जिंकावी यातच सर्वाचे हित दडलेले आहे. अशात विनाकारण गावात फिरणारे पोलीस कर्मचाºयांना आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा येथील ठाणेदार दीपक जाधव यांनी दिला आहे.कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शासनाने ‘लॉकडाऊन’ व संचारबंदीची घोषणा केली आहे. नागरिकांच्या काळजी पोटी असून कोणीही घराबाहेर पडू नये अशी प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देवूनही कोरोना विषाणू संदर्भात नागरिकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. विनाकारण गावात फिरण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना इच्छा नसतानांही सौम्य लाठीप्रसाद देण्याचा पोलीस कर्मचाºयांना उपाय हातात घ्यावा लागत आहे. जमावबंदीचे कोणाकडूनही उल्लंघन होणार नाही याची सतत काळजी घेवून रात्रंदिवस तैनात राहून पोलीस पहारा देत आहेत. तसेच बाहेर राज्यातून कुणी येणार आहे याची दक्षता घेतली जात आहे.गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. शासनाने परवानाधारक दारु दुकान बंद केले आहेत. याचा फायदा घेत काही गावांत मोहफुलाची दारु काढून गावातील शांतता भंग केल्याचे प्रकार माहिती होताच त्यांच्यावर धाड टाकून गुन्हा नोंदविला जात आहे. अशात नागरिकांनी या लढ्यात सहकार्य करुन संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळावे अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा ठाणेदार जाधव यांनी दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस