शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदार कार्यालय नावापुरतेच

By admin | Updated: February 19, 2015 01:06 IST

नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता आठ-दहा वर्षांपूर्वी तत्कालिन आ.सेवक वाघाये यांनी सौंदड येथे नायब तहसीलदार यांचे कार्यालय सुरू करण्यास भाग पाडले.

सौंदड (रेल्वे) : नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता आठ-दहा वर्षांपूर्वी तत्कालिन आ.सेवक वाघाये यांनी सौंदड येथे नायब तहसीलदार यांचे कार्यालय सुरू करण्यास भाग पाडले. तेथील कारभार दोन-तीन वर्षे व्यवस्थित सुरू होता, मात्र आता नायब तहसीलदारांनीच कार्यालयात येणे बंद केल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सौंदड येथे नायब तहसीलदारांचे कार्यालय पूर्वी व्यवस्थित सुरू होते. नायब तहसीलदारही पूर्ण वेळ कार्यालयात उपस्थित राहत होते. त्यावेळी या कार्यालयांतर्गत १५ ते १६ गावांचा कारभार चालत असे. दहा-बारा प्रकारची महत्त्वाची महसुली कामेही या कार्यालयांतर्गत होत होती. नागरिकांची कामे पटकन व सोयीने होत असल्याने सौंदड मंडळांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने सौंदड कार्यालयातून आपले काम उरकून घेत असत. या प्रकारामुळेमुळे तहसील कार्यालयात जाणारा लोंढा कमी झाला होता. लोंढा कमी झाल्याने त्या-त्या वेळच्या तहसीलदारांच्या अतिरीक्त आवकवरही परिणाम झाला व त्यांनी सौंदड येथील नायब तहसीलदारांचे एकेक अधिकार कमी करत गेले. शेवटी उत्पन्नाचे दाखले, प्रमाणपत्र व अशाच कनिष्ठ दर्जाच्या प्रमाणपत्रांवर सह्या करण्यापुरते अधिकार ठेवण्यात आले. त्यामुळे नायब तहसीलदार या कार्यालयात बसण्यास टाळाटाळ करू लागले. कधी यायचे तर कधी यायचेच नाही. शेवटी त्यांनी या कार्यालयात येणेच बंद केले. त्यांच्या हातून महत्त्वाच्या कामांचे अधिकार काढून घेतल्याने ते ही नाराज व उदासिन झाले होते. तेव्हापासून जवळपास आठ ते दहा वर्षापासून सौंदड येथे नायब तहसीलदार कार्यालय आहे, परंतु नायब तहसीलदाराच येत नाही. आता सौंदड मंडळातील नागरिकांना तहसीलच्या कामासाठी सडक-अर्जुनीला जावे लागते. यात नागरिकांचा वेळ व पैसा वाया जातो. त्यामुळे तहसीलदारांनी सौंदड येथील नायब तहसीलदार कार्यालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेना तालुका अध्यक्ष सदाशिव विठ्ठले व या कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची कार्यालयांना दांडी सौंदड येथील तलाठ्यांनी सात-आठ दिवसांपूर्वी नव्याने पदभार सांभाळला. तेव्हापासून ते कार्यालयात हजर राहत नसल्यामुळे व मंडळ अधिकारी कोणतेही कारण सांगून तेसुद्धा आपल्या कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही. वेळी-अवेळी कार्यालयात येतात. नागरिकांना वाट पाहत ताटकळत बसावे लागते. या दोन्ही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची आठ दिवसात बदली करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुका शिवसेना प्रमुख सदाशिव विठ्ठले यांनी दिला आहे. तसेच नायब तहसीलदार कार्यालयात पूर्ण वेळ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व्यवस्था लवकरात लवकर करण्याची मागणीही केली आहे.