शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

माय बापहो...लेकरं सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:34 IST

अजानत्या मिसरूड न फुटलेल्या वयात लाजलज्जा वेशीवर टांगून केलेल्या नको त्या कृत्यांचा परिणाम इतरांवर होतो. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देपालकांना संदेश : गांजा ओढणाऱ्या मुलांचे प्रकरण चर्चेत

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : अजानत्या मिसरूड न फुटलेल्या वयात लाजलज्जा वेशीवर टांगून केलेल्या नको त्या कृत्यांचा परिणाम इतरांवर होतो. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वाढली आहे. अशीच एक गंभीर व मनाला चटका लावणारीच नव्हे तर हादरविणारी घटना सोमवारी (दि.१९) उघडकीस आली. तालुक्यातील निमगाव येथे गांजा ओढणाऱ्या किशोरवयीन मुलांनी एका इसमाला मारहाण केली. सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.तालुक्यातील ग्राम निमगाव हे अवघे अडीच हजार लोकवस्तीचे खेडेगाव असून येथे घडलेला प्रताप हा मायबापांना निश्चितच अंतर्मुख करणारा आहे. सोमवारी दुपारी तीन किशोरवयीन मुलं गावातीलच मैदानावर बसली होती. एक चिमुकला त्यांच्यापाशी पोहोचला. त्याने जे दृश्य बघितले ते अत्यंत विदारक होते. याची वाच्यता त्याने एका ग्रामस्थाकडे केली व तो इसम त्यांच्याकडे गेला असता तिन्ही मुल गांजा पित बसली होती. यावर इसमाने त्यांना हटकले असता तिघे चक्क त्या इसमावर धावून गेले. त्या इसमाचे दोघांनी हात पकडून ठेवले व एका मुलाने इसमाच्या पोटावर बुक्यांनी मारले.सोमवारी निमगाव ग्रामपंचायतची ग्रामसभा होती व तो इसम तिथे पोहोचला. त्याने झालेला प्रकार गावच्या पोलीस पाटलांना सांगितला. त्यांनी याची सूचना पोलिसांत दिली. पोलिसांनी गांजासह तिघांनाही ठाण्यात आणले. मारहाण झालेला इसम तक्र ार नोंदविण्यासाठी ठाण्यात आला मात्र काय घडले काय ठाऊक तक्र ार न करताच तो परतला. ही माफी किशोरवयीन मुलांना दिलासा देणारी ठरली. मात्र दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या या पिढीला वेळीच आवर घालणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.तारु ण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या पाल्याचा पाय कदाचित वाकडा पडू शकतो. त्याचेही पाय अशा व्यसनाच्या आहारी गेलेल्यांपैकी एक असू शकते. घराघरात पोहचलेले चॅनल, इंटरनेट, आधुनिक मोबाईल, त्यावरून फिरणारे संदेश आदी बाबी कदाचित ही उद्याची पिढी बरबाद करण्यासाठी जबाबदार ठरू शकते. यात आपल्या पोटच्या गोळ््याचे भवितव्य गारद होऊ शकते. वारंवार कृती करून निर्ढावलेली कोवळी पोरं तारु ण्यात शौक भागविण्यासाठी वाटेल ते करतात हे चित्र आपण नेहमीच बघतो व हाच प्रकार निमगाव येथे बघायवयास मिळाला. तरूणाईच्या उंबरठ्यावर असलेल्या किशोरवयीन मुलांना आजच सावरणे गरजेचे आहे. त्यामुळे या भीषण वादळाची दिशा ओळखून बापहो ..... लेकरं सांभाळा असे म्हणावेसे वाटते.अंतर्मुख व्हा...सजग राहाज्यांना जन्म दिला ती चिल्ली-पिल्ली वाममार्गाला लागली आहेत, पण या संकटाचा अंदाज आपल्याला अजूनही कसा येत नाही ? मुलांना नामांकित, महागड्या शाळेत घातलं, त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण केल्या, पालकसभेला नियमित हजेरी लावली की बस्स संपलं. मात्र जागरूक पालक म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करण्यापलीकडेही मायबाप म्हणून आपल्याला खूप काही करायचं आहे. हा प्रश्न निमगावात घडलेल्या घटनेनंतर तुम्हांला छळू लागेल. यासाठी अंतर्मुख व्हा .... सजग राहा .......एवढाच संदेश देता येईल.पोलिसांनीही मनावर घेतले नाहीनिमगावच्या पोलीस पाटलांनी पोलिसांना बोलाविले. मार खाणाऱ्यानेही तक्र ार नोंदविली नाही. मात्र हा प्रश्न सुजाण युवापिढी घडविण्यासाठी घातक होता. तीन किशोरवयीन मुलांपैकी एक मुंबई, दुसरा चंद्रपूर व तिसरा निमगावचा होता. मुलांजवळ तर अगदी थोडासा गांजा मिळाला पण तो नेमका आला कुठून ? याची उकल त्या किशोरवयीन मुलांकडून करून घेणे गरजेचे होते. यासाठी पोलीस पाटलांची तक्र ार घेता येऊ शकली असती. अर्जुनी-मोरगाव शहरातही गांजा विकला जातो. यापासून पोलीस अनभिज्ञ नाही. पण अशा या युवापिढीला देशोधडीला लावणाऱ्या गैरकृत्यांवर पोलीस अंकुश का लावत नाही हा खरा आत्मचिंतनाचा विषय आहे. एका पत्रकाराने ठाणेदार महादेव तोंदले यांना यासंदर्भात विचारणा केली तेव्हा त्यांनी ही फेक न्यूज असल्याचे सांगितले. त्यावेळी ती तीन किशोरवयीन मुले व निमगावची प्रतिष्ठित मंडळी ठाण्यातच होती. खोटे बोलण्यामागील रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे.