शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

माय बापहो...लेकरं सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 9:31 PM

अजानत्या मिसरूड न फुटलेल्या वयात लाजलज्जा वेशीवर टांगून केलेल्या नको त्या कृत्यांचा परिणाम इतरांवर होतो. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देपालकांना संदेश : गांजा ओढणाऱ्या मुलांचे प्रकरण चर्चेत

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : अजानत्या मिसरूड न फुटलेल्या वयात लाजलज्जा वेशीवर टांगून केलेल्या नको त्या कृत्यांचा परिणाम इतरांवर होतो. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वाढली आहे. अशीच एक गंभीर व मनाला चटका लावणारीच नव्हे तर हादरविणारी घटना सोमवारी (दि.१९) उघडकीस आली. तालुक्यातील निमगाव येथे गांजा ओढणाऱ्या किशोरवयीन मुलांनी एका इसमाला मारहाण केली. सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.तालुक्यातील ग्राम निमगाव हे अवघे अडीच हजार लोकवस्तीचे खेडेगाव असून येथे घडलेला प्रताप हा मायबापांना निश्चितच अंतर्मुख करणारा आहे. सोमवारी दुपारी तीन किशोरवयीन मुलं गावातीलच मैदानावर बसली होती. एक चिमुकला त्यांच्यापाशी पोहोचला. त्याने जे दृश्य बघितले ते अत्यंत विदारक होते. याची वाच्यता त्याने एका ग्रामस्थाकडे केली व तो इसम त्यांच्याकडे गेला असता तिन्ही मुल गांजा पित बसली होती. यावर इसमाने त्यांना हटकले असता तिघे चक्क त्या इसमावर धावून गेले. त्या इसमाचे दोघांनी हात पकडून ठेवले व एका मुलाने इसमाच्या पोटावर बुक्यांनी मारले.सोमवारी निमगाव ग्रामपंचायतची ग्रामसभा होती व तो इसम तिथे पोहोचला. त्याने झालेला प्रकार गावच्या पोलीस पाटलांना सांगितला. त्यांनी याची सूचना पोलिसांत दिली. पोलिसांनी गांजासह तिघांनाही ठाण्यात आणले. मारहाण झालेला इसम तक्र ार नोंदविण्यासाठी ठाण्यात आला मात्र काय घडले काय ठाऊक तक्र ार न करताच तो परतला. ही माफी किशोरवयीन मुलांना दिलासा देणारी ठरली. मात्र दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या या पिढीला वेळीच आवर घालणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.तारु ण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या पाल्याचा पाय कदाचित वाकडा पडू शकतो. त्याचेही पाय अशा व्यसनाच्या आहारी गेलेल्यांपैकी एक असू शकते. घराघरात पोहचलेले चॅनल, इंटरनेट, आधुनिक मोबाईल, त्यावरून फिरणारे संदेश आदी बाबी कदाचित ही उद्याची पिढी बरबाद करण्यासाठी जबाबदार ठरू शकते. यात आपल्या पोटच्या गोळ््याचे भवितव्य गारद होऊ शकते. वारंवार कृती करून निर्ढावलेली कोवळी पोरं तारु ण्यात शौक भागविण्यासाठी वाटेल ते करतात हे चित्र आपण नेहमीच बघतो व हाच प्रकार निमगाव येथे बघायवयास मिळाला. तरूणाईच्या उंबरठ्यावर असलेल्या किशोरवयीन मुलांना आजच सावरणे गरजेचे आहे. त्यामुळे या भीषण वादळाची दिशा ओळखून बापहो ..... लेकरं सांभाळा असे म्हणावेसे वाटते.अंतर्मुख व्हा...सजग राहाज्यांना जन्म दिला ती चिल्ली-पिल्ली वाममार्गाला लागली आहेत, पण या संकटाचा अंदाज आपल्याला अजूनही कसा येत नाही ? मुलांना नामांकित, महागड्या शाळेत घातलं, त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण केल्या, पालकसभेला नियमित हजेरी लावली की बस्स संपलं. मात्र जागरूक पालक म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करण्यापलीकडेही मायबाप म्हणून आपल्याला खूप काही करायचं आहे. हा प्रश्न निमगावात घडलेल्या घटनेनंतर तुम्हांला छळू लागेल. यासाठी अंतर्मुख व्हा .... सजग राहा .......एवढाच संदेश देता येईल.पोलिसांनीही मनावर घेतले नाहीनिमगावच्या पोलीस पाटलांनी पोलिसांना बोलाविले. मार खाणाऱ्यानेही तक्र ार नोंदविली नाही. मात्र हा प्रश्न सुजाण युवापिढी घडविण्यासाठी घातक होता. तीन किशोरवयीन मुलांपैकी एक मुंबई, दुसरा चंद्रपूर व तिसरा निमगावचा होता. मुलांजवळ तर अगदी थोडासा गांजा मिळाला पण तो नेमका आला कुठून ? याची उकल त्या किशोरवयीन मुलांकडून करून घेणे गरजेचे होते. यासाठी पोलीस पाटलांची तक्र ार घेता येऊ शकली असती. अर्जुनी-मोरगाव शहरातही गांजा विकला जातो. यापासून पोलीस अनभिज्ञ नाही. पण अशा या युवापिढीला देशोधडीला लावणाऱ्या गैरकृत्यांवर पोलीस अंकुश का लावत नाही हा खरा आत्मचिंतनाचा विषय आहे. एका पत्रकाराने ठाणेदार महादेव तोंदले यांना यासंदर्भात विचारणा केली तेव्हा त्यांनी ही फेक न्यूज असल्याचे सांगितले. त्यावेळी ती तीन किशोरवयीन मुले व निमगावची प्रतिष्ठित मंडळी ठाण्यातच होती. खोटे बोलण्यामागील रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे.