शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास विभागात सर्वाधिक लाचखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST

गोंदिया : काम करून देण्याच्या मोबदल्यात खर्चा-पाणी, तसेच मिठाईच्या नावावर पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार आज सर्वच कार्यालयांत ...

गोंदिया : काम करून देण्याच्या मोबदल्यात खर्चा-पाणी, तसेच मिठाईच्या नावावर पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार आज सर्वच कार्यालयांत सर्रास सुरू आहे. यात शासकीयच काय, खासगी कार्यालयांचाही समावेश आहे. पैशांची अशी मागणी करणाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून दणका दिला जात आहे. अशात लाचखोरीचे हे प्रमाण जिल्हा परिषद-पंचायत समिती ग्रामविकास विभागात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सन २०१६ पासूनच्या आकडेवारीनुसार, जिल्हा परिषद-पंचायत समिती ग्रामविकास विभागात २५ कारवाया करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, येथेच सर्वाधिक लाचखोरी होत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आजच्या काळात नातेसंबंधांपेक्षा माणसाला पैसा जास्त मोठा झाला आहे. हेच कारण आहे की, काम करून देण्याची आपली जबाबदारी आहे हे समजून न घेता, माणूस प्रत्येकच कामासाठी समोरील व्यक्तीकडून काही ना काही अपेक्षा बाळगून असतो. यात सर्वाधिक प्रकार पैशांच्या देवाण-घेवाणीचे चालतात. शासकीय काय तर खासगी कार्यालयांतही आता खुलेआम पैशांची मागणी केली जाते. मजबुरी असल्याने काम करवून घेण्यासाठी आज प्रत्येकच व्यक्ती पैसा मोजून देतो. पैसा घेऊन काम करून देणे ही समाजात एक परंपराच बनली आहे आणि येथूनच आजघडीला खर्चापाणी किंवा मिठाईच्या नावावर लाचखोरी फोफावत चालली आहे.

खर्चापाणीच्या नावावर सुरू असलेल्या या लाचखोरीवर आळा घालण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत असून, अशा लाचखोरांना ते दणका देत आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येकच व्यक्ती लाच मागणाऱ्याच्या विरोधात तक्रार देत नसल्याने समाजातून लाचखोरी अद्याप संपुष्टात आली नाही. मात्र, हा प्रकार खपवून न घेणाऱ्या व्यक्तींमुळे काही लाचखोर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या हातीही लागतात. अशाच लाचखोरांची पाहणी केल्यास, जिल्हा परिषद-पंचायत समिती ग्रामविकास विभागात लाचखोरीचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे दिसून आले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सन २०१६ ते २०२० पर्यंतच्या अहवालातून हा प्रकार उघडकीस आला आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ग्रामविकास विभागात सन २०१६ पासून २०२० पर्यंत २५ कारवाया करण्यात आल्या असून, २९ आरोपींना दणका देण्यात आला आहे. यामध्ये सन २०१६ मध्ये ४ कारावायांत ५ आरोपी, सन २०१७ मध्ये ४ कारवायांत ५ आरोपी, सन २०१८ मध्ये ८ कारवायांत ९ आरोपी, सन २०१९ मध्ये ४ कारवायांत ५ आरोपी, तर सन २०२० मध्ये ५ कारवायांत ५ आरोपींना दणका देण्यात आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर महसूल विभाग असून, येथे १७ कारवायांत १९ आरोपी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहेत.

-----------------------------

जलसंपदा विभागात फक्त १ कारवाई

ग्रामविकास व महसूल विभागात जेथे लाचखोरी बो‌काळलेली दिसत आहे, तेथेच जलसंपदा विभागात सर्वात कमी फक्त १ कारवाई करण्यात आली आहे. एकंदर लाचखोरीच्या प्रकारात जलसंपदा विभाग तेवढ्याने ठीक दिसून येत आहे. मात्र, १ कारवाई झाल्यानंतर जलसंपदा विभागही धुतलेले नाही, हे दिसून येते. विशेष म्हणजे, सर्वच विभागांत लाचखोरीची कीड लागलेली आहे. यात कोठे ती उघडकीस येते, तर कोठे ती असूनही आतल्या आत पोखरत चालली आहे.

---------------------------

नववर्षातही खाते उघडले

सन २०२१ मध्ये देशात कोरोना लस आली व सर्वांसाठीच नववर्ष सुखद लाभले आहे. अशात लाच लुचपत प्रतिबंधक विभागासाठीही नववर्ष भरभराटीचे लागले आहे. कारण विभागाने नववर्षात आतापर्यंत ३ कारवाया करून खाते उघडले आहे. यामध्ये पहिली कारवाई पोलीस खात्यातील, दुसरी कारवाई बाल विकास प्रकल्प कार्यालयातील, तर तिसरी कारवाई सीमा तपासणी नाका येथे करण्यात आली आहे.