शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कृउबासला जिल्हा उपनिबंधकांचे पत्र

By admin | Updated: May 11, 2014 00:24 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधारभूत खरेदी किमतीपेक्षा कमी दराने होत असलेली खरेदी-विक्री याबाबत दैनिक लोकमतमध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली.

तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधारभूत खरेदी किमतीपेक्षा कमी दराने होत असलेली खरेदी-विक्री याबाबत दैनिक लोकमतमध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली. ३ मे २०१४ ला धानाची खरेदी आधारभूत खरेदी किमतीपेक्षा कमी दराने धान खरेदी करुन व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांचे शोषण केले. ‘बाजार समितीत शेतकर्‍यांचे शोषण, आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी’ या शीर्षकाखाली लोकमतला ५ मे रोजी बातमी प्रकाशित करण्यात आली. तर ६ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला भेट देवून याबाबत तीन दिवसांत खुलासा मागितला आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी बाजार समितीला दिलेल्या पत्रात महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास वा विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ३२ ड, नुसार शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत बाजार क्षेत्रामध्ये कृषी उत्पादन खरेदी करण्यास प्रतिबंध करण्याची व्यवस्था करणे आणि विहित करण्यात येईल. अशी उपाययोजना करणे हे पूर्णपणे बाजार समितीचे कर्तव्य असेल, अशी तरतूद आहे. तरी आपले बाजार समितीमध्ये ३ मे रोजी रोजी धान या शेतमालाची आधारभूत खरेदी किंमतीपेक्षा कमी दराने विक्री झालेली असल्याने समितीद्वारे उपरोक्त नमूद केलेल्या कायद्यातील तरतुदींचे पालन का करण्यात आले नाही? तसेच आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत धान खरेदी केलेल्या व्यापार्‍यावर समितीने काय कारवाई केली? याबाबतचा समितीचा स्वयंस्पष्ट खुलासा कार्यालयास तीन दिवसांच्या आत सादर करावा अन्यथा आपणांवर महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अन्वये कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. अशा स्वरुपाच्या पत्रावर बाजार समिती कोणता खुलासा सादर करते, पत्रानुसार व्यापार्‍यांवर कोणती कारवाई करते याबाबत शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. समितीवर व्यापारी, मिलमालक, दलाल व संचालक मंडळाचे वर्चस्व असल्याने याबाबत थातूरमातूर कारवाई केली जाईल, अशा प्रकारची चर्चा आहे. तर असे पत्र कित्येकदा येतात, अशा प्रकारचे मत काही संचालक मंडळांचे आहे, असेही बोलल्या जात आहे.(शहर प्रतिनिधी)