शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

परिश्रम शेतकऱ्यांचे; मर्जी व्यापाऱ्यांची

By admin | Updated: December 1, 2014 22:57 IST

संकरित व सुधारित बियाण्यांच्या नावावर वाटेल त्या किमतीत बियाणे विकून शेतकऱ्यांना लुबाळणे, त्यानंतर खत विक्री व किटकनाशक औषधे विक्री व शेवटी धान खरेदी पडक्या भावाने करीत अगदी

विजय मानकर - सालेकसा
संकरित व सुधारित बियाण्यांच्या नावावर वाटेल त्या किमतीत बियाणे विकून शेतकऱ्यांना लुबाळणे, त्यानंतर खत विक्री व किटकनाशक औषधे विक्री व शेवटी धान खरेदी पडक्या भावाने करीत अगदी सुरुवातीपासून तर सुगीच्या दिवसापर्यंत भातपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण व्यापारी वर्ग करीत आहे.
हा शोषण असह्य होवूनही शेतकरी नेहमी सर्वकाही सहन करीत आहे. त्यामुळे शोषित शेतकरी कर्जाच्या चक्रव्युहातून कधीच बाहेर निघत नाही. अर्थात परिश्रम शेतकरी करतो. मात्र त्यावर मर्जी व्यापाऱ्यांची चालते. शेतकऱ्यांची ही दैनावस्था वर्षानुवर्षे चालत राहिली आणि आजसुद्धा सुरू आहे.
पेरणीपूर्व मशागतीपासून तर धान कापणी आणि मळणीपर्यंत धान उत्पादक शेतकरी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुले, वृद्ध आई-वडिलांसह प्रत्येक सदस्याची कोणती न कोणती मदत घेत सतत मेहनत करतो. पीक चांगले यावे म्हणून दिवसरात्र एक करणे, पहाटे लवकर उठणे, रात्री उशिरा झोपणे हा नित्यक्रम चालवितो. ऊन-पावसात आपल्या प्रकृतीची चिंता न करता दिवसभर खपतो आणि राबतो. परंतु शेवटी शेतमालाच्या आर्थिक व्यवहारासंबंधी आपल्या मर्जीनुसार कोणतेही कार्य करु शकत नाही. साऱ्या देशाचे पोट भरण्यासाठी अन्न निर्माण करणारा धान उत्पादक शेतकरी आपला पोटसुद्धा आपल्या मर्जीनुसार भरु शकत नाही, हे या शेतकऱ्यांचे मोठेच दुर्दैव आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला बियाणे पेरणीपासून वेगवेगळ्या स्वरुपात सुरुवात होते. पेरणीसाठी धान बियाणे खरेदी करायला गेल्यास सुधारित बियाणे खरेदी करताना ठोकळ स्वरुपाचे बियाणे साधारणत: ५० रूपयांपासून तर १०० रुपये प्रति किलोपर्यंत खरेदी करावे लागते. तसेच बारीक प्रजातीचे धान १५० रूपये प्रतिकिलोपर्यंत खरेदी करावे लागते. जर शेतकऱ्याला संकरित धान बियाणे खरेदी करायचे असल्यास ३०० पासून तर ५०० रूपये प्रति किलोप्रमाणे किमत मोजावी लागते. कमीत कमी जागेवर जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या मोहात शेतकरी ती किमत देवून संकरित बियाणे खरेदी करतो. परंतु अनेकवेळा संकरित बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूकसुद्धा होते. याची तक्रार शेतकरी त्या व्यापाऱ्यांकडे करू शकत नाही किंवा नकली संकरित बियाणे परत करणे शक्य होत नाही. बियाणे खरेदी करण्यात झालेला तोटा सहन करावाच लागतो. बियाणे बोगस निघाल्यावर त्यांची योग्यप्रकारे नर्सरी तयार होत नाही. त्यामुळे पुन्हा पैसे खर्च करुन नवीन बियाणे खरेदी करावे लागतात व दुबार पेरणी करावी लागते. आता तर अनेक व्यापारी सुधारित धान बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची व्यवस्थित पॅकिंग करुन शेतकऱ्यांना मुर्ख बनविण्याचा धंदा करीत आहेत. बियाणे खरेदीत शोषण केल्यावर खत खरेदीमध्ये शेतकऱ्यांना एमआरपी किमतीपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. ऐवढेच नाही तर बोगस व भेसळ रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर कृषी केंद्रावर विक्री होत असून उधारी स्वरुपात खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमी मुर्ख बनविण्याची कामे व्यापाऱ्यांकडून केली जात आहेत. युरिया खतावर शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान मिळते. परंतु अनुदानाचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कधीच लाभ मिळत नाही. युरियाच्या तुटवड्याच्या नावावर मर्जीप्रमाणे दर लावून शेतकऱ्यांना खत विक्री केली जाते. धान पिकाला निश्चित वेळेवर युरिया दिले नाही तर पिकांवर परिणाम होतो, असी समज धान उत्पादक शेतकऱ्यांना असते. त्यामुळे किमतीची पर्वा न करता तो खत खरेदीला महत्त्व देतो. परंतु या संधीचा गैरफायदा घेत व्यापारी वर्ग शेतकऱ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करतात. उधारी खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना तर वाटेल त्या दरात खते दिली जातात. मात्र उधारी वसूल करताना व्याज लावले जाते. खत खरेदीनंतर किटकनाशक खरेदीतसुद्धा अशीच लुबाडणूक केली जाते.