शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार

By admin | Updated: February 7, 2015 23:25 IST

जनतेची दिशाभूल करून केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाले. राज्यात या घोषणाबाज सरकारने गेल्या १०० दिवसात एक तरी घोषणा अंमलात आणली का?

काँंग्रेसचा हल्लाबोल : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले हजारों कार्यकर्ते व नागरिकगोंदिया : जनतेची दिशाभूल करून केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाले. राज्यात या घोषणाबाज सरकारने गेल्या १०० दिवसात एक तरी घोषणा अंमलात आणली का? असा सवाल करीत हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार आहे, असा हल्ला काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते आणि माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, आ.गोपालदास अग्रवाल, आ.सुनील केदार, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आ.रामरतन राऊत, सेवक वाघाये, अशोक लंजे, अमर वऱ्हाडे, राजेश नंदागवळी, डॉ.योगेंद्र भगत, नामदेव किरसान आदी अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्या, कृषी उत्पादनाच्या हमीभावात वाढ करा, भूमी अधिग्रहण कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश परत घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करा, गॅस पुरवठा धोरण पुर्ववत करा, ग्रामीण भागातील लोडशेडींग बंद करा अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजता सर्कस मैदानावरून निघालेला हा मोर्चा २.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. विविध घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या सरकराने सत्तेत आल्यापासून केवळ घोषणाच केल्या आहेत. दिलेल्या आश्वासनांपैकी कोणत्याच आश्वासनाची पूर्तता केली आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या एका आमदारानेही ही बाब खासगीत कबुल करताना सरकार किती नाकर्ते आहे हे सांगितल्याचे विखे पाटील म्हणाले. सरकारमध्ये संवेदनशीलता नाही. मराठवाड्यासारख्या क्षेत्रात कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. मात्र या सरकारच्या काळात तेथील आत्महत्या वाढल्या आहेत. हेच अच्छे दिन आहेत का? असा सवाल करून आता ‘बुरे दिन’ आले असल्याचे ते म्हणाले.प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हे सरकार शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे नसून केवळ भांडवलदारांचे असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली खुर्ची वाचविण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणतील तसे निर्णय घेत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रातील उद्योग आणि पाणी गुजरातमध्ये पळविले जात असल्याचे ते म्हणाले.धानाला ५०० रुपये बोनस दिला नाही तर कोणत्याही खासदार, आमदार, मंत्र्याला गावात येऊ देऊ नका, असे सांगून त्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्यासाठी आंदोलन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या भाषणात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आपली चूक सुधारण्याचे आवाहन केले. (जिल्हा प्रतिनिधी)