शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
3
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
4
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
8
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
9
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
10
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
11
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
12
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
13
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
14
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
15
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
16
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
17
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
18
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
19
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
20
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक ग्राम योजनेत सदस्यांचीच उदासीनता

By admin | Updated: November 30, 2014 23:06 IST

सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनी निवडलेल्या गावाचे नाव

गोंदिया : सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनी निवडलेल्या गावाचे नाव पंचायत विभागाकडे द्यावयाचे होते. मात्र ५२ पैकी आतापर्यंत केवळ २० सदस्यांनी गावांचे नाव देऊन स्वच्छता अभियानाबद्दलच्या उदासीनतेचा परिचय दिला आहे. जे सदस्य स्वत:च उदासीन आहेत ते गावाला स्वच्छतेची सवय कशी लावणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
स्वच्छ भारत मिशन हे अभियान शहरांपुरतेच मर्यादीत न राहता यात लहानातील लहान गाव सहभागी होऊन प्रत्येक स्तरापर्यंत स्वच्छतेचा संदेश जावा हा उद्देश आहे. यातूनच या अभियानांतर्गत प्रत्येक खासदारांना एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याचे निर्देश देण्यात आले. याच धर्तीवर जिल्हा परिषदेने देवरी येथे स्वच्छता अभियान राबविले व त्यावेळी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावा असे ठरले. यासाठी २६ नोव्हेंबर पर्यंत सदस्यांनी आपापल्या क्षेत्रातील निवडण्यात आलेले गाव जिल्हा परिषद पंचायत विभागाकडे कळविणे गरजेचे होते.
मात्र कित्येक जिल्हा परिषद सदस्यांनी अद्याप गावांची नावे कळविलीच नसल्याची माहिती आहे. तर काही सदस्य सहलीसाठी बाहेरगावी निघून गेल्याचे ऐकीवात आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत जिल्ह परिषद अध्यक्षांनाही माहिती नसून विभागाकडे फक्त त्यांनी निवडलेल्या गावाची माहिती आहे.
गावातील लोकप्रतिनिधी, संस्था व शाळांची मदत घेऊन त्या गावात अभियान राबवायचे आहे. मात्र येथे जिल्हाम परिषद सदस्य स्वत:च उदासिन असताना अभियानाचा फज्जा उडविला जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. विशेष म्हणजे या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्राम पंचायत सरपंच, सचिव, सदस्यांसह जिल्हा परिषद सदस्यांचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्याचे ठरले आहे.
मात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या उदासिनतेमुळे या अभियानावरच प्रश्न लागले आहे. तर या गंभीर प्रकरणाला घेऊन पंचायत विभागातील एक कर्मचारी २८ नोव्हेंबर रोजी पत्र घेऊन जिल्हा परिषद सदस्यांकडे गेल्याचीही माहिती हाती लागली. अशात आता कसे तरी हे अभियान एकदाचे उरकून घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)