शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र फिडरमुळे अडचणी सुटणार

By admin | Updated: March 13, 2016 02:08 IST

मागेल त्याल वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे चित्र बदलत असून राज्याची वीज भारनियमन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.

पालकमंत्री बडोले : ३३ के.व्ही.च्या कोहमारा उपकेंद्राचे उद्घाटन गोंदिया : मागेल त्याल वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे चित्र बदलत असून राज्याची वीज भारनियमन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. कृषी पंप जोडणीमुळे शेतकरी आता बारमाही शेतीकडे वळत आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या वीजेबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी आता फिडर सेपरेशनचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा (कोसबी) येथे राज्य वीज वितरण कंपनीच्या ३३/११ के.व्ही उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, महावितरणच्या गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.के.जनवीर, अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण, ए.एस.घोगरे, भंडाराचे अधीक्षक अभियंता मडावी, गोंदियाचे कार्यकारी अभियंता सावळे, देवरीचे कार्यकारी अभियंता वाकडे, सडक/अर्जुनीचे उपविभागीय अभियंता दखने, विद्युत निरीक्षक विजय खापर्डे, पंचायत समिती सदस्य गिरधारी हत्तीमारे, कोसबी सरपंच अल्का रामटेके, उपसरपंच कृष्णा कोरे, माजी पंचायत समिती सभापती पद्मा परतेकी उपस्थित होते.पुढे बोलताना बडोले यांनी, वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना विज कनेक्शन देण्याचा रेकार्ड केला असून यामुळे शेतकऱ्यांच्या तक्र ारी कमी होत आहेत. त्यात आता खोबा, कोसमतोंडी व केशारी येथे लवकरच नवीन उपकेंद्राचे काम सुरु करण्यात येईल. क्षेत्रनिहाय वीज पुरवठा ग्राहकांना व्यवस्थितपणे देणे हे कंपनीचे काम आहे. शेंडा व दल्ली परिसरातील शेतक री व ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून सरासरी बिल देण्यात येत असल्याच्या तक्र ारी आहेत तरी मीटर रिडींगनुसार बिल देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. तसेच मागास व दुर्गम क्षेत्रातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी इन्फ्रा-२ चे योग्य नियोजन करावे. राज्यातील दलित वस्त्यांना योग्यप्रकारे वीज पुरवठा व्हावा, तसेच वीज उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सामाजिक न्याय विभागाकडून ४०० ते ५०० कोटी रुपये देण्यात येईल. शेतकऱ्यांनीसुध्दा वीज बिलाचा भरणा त्वरीत करु न वीज कंपनीला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.अध्यक्षस्थानावरुन बोलतांना रंगारी यांनी, कोहमारा येथे नव्याने तयार झालेल्या उपकेंद्रामुळे या भागातील नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या व घरगुती वीज ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वीज वितरण कंपनीने वेळीच लक्ष द्यावे असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून जनवीर यांनी, २ कोटी ५० लक्ष रु पये खर्च करु न तयार करण्यात आलेल्या कोहमाराच्या या उपकेंद्रामुळे परिसरातील २० गावांना लाभ होणार आहे. विकासकामे करताना कंपनीला वीज ग्राहकांनी सहकार्य केल्यास समस्यांवर मात करण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. संचालन उपअभियंता परिहार यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता वाकडे यांनी मानले. या कार्यक्रमाला कोहमारा परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)