शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

चार तालुक्यात अतिवृष्टी, धानपीक झाले भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 22:25 IST

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. बरेच शेतकरी हलक्या धानाची कापणी आणि मळणी दिवाळीपूर्वी करून दिवाळी सण साजरा करतात. पण, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला मोठ्या प्रमाणात बसला. मंगळवारी (दि.११) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील उभे धानपीक जमीनदोस्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून गेल्या २४ तासात जिल्ह्यातील चार तालुक्यात  अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे धानपीक भुईसपाट झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने  शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. बरेच शेतकरी हलक्या धानाची कापणी आणि मळणी दिवाळीपूर्वी करून दिवाळी सण साजरा करतात. पण, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला मोठ्या प्रमाणात बसला. मंगळवारी (दि.११) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील उभे धानपीक जमीनदोस्त झाले. तर बांध्यामध्ये पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर पावसामुळे शेतकऱ्यांना हाती आलेला पीक गमावण्याची वेळ आली आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाचा अंदाज घेता शेतकऱ्यांनी पुढील चार-पाच दिवस हलक्या धानाची कापणी करून नये, असा सल्ला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. दरम्यान परतीच्या पावसाने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. 

नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

आठपैकी चार तालुक्यात अतिवृष्टी जिल्ह्यात मागील २४ तासात आठपैकी चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून एकूण ५१.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यात ७५.५ मीमी, आमगाव ७१.८ मीमी, तिरोडा ९४.२ मीमी आणि गोरेगाव तालुक्यात ६५.१ मीमी पावसाची नोंद झाली आहे. 

हजारो हेक्टरमधील पिके झाली बाधित - जिल्ह्यात यंदा १ लाख ७६ हजार हेक्टरमध्ये धानाची लागवड करण्यात आली असून सध्या हलक्या धानाची कापणी सुरू आहे. तर जड धानाची कापणी पुढील महिन्यापासून सुरू होईल. धानपीक जोमात असताना परतीच्या पावसाने त्यावर पाणी फेरल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. 

ऑक्टोबर महिन्यात प्रथमच अतिवृष्टीची नोंद पावसाळ्याचा कालावधी हा जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. पण यंदा सप्टेंबर महिना लोटूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यातच मागील २४ तासात जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीची नोंद प्रथमच झाली असून परतीचा पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा बरसल्याचे जिल्ह्यातील वयोवृद्धांनी सांगितले. तर पावसाचे संकट कायम असल्याने शेतकऱ्यांना धान पिकांची चिंता सतावत आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती