शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यात अतिवृष्टी, धानपीक झाले भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 22:25 IST

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. बरेच शेतकरी हलक्या धानाची कापणी आणि मळणी दिवाळीपूर्वी करून दिवाळी सण साजरा करतात. पण, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला मोठ्या प्रमाणात बसला. मंगळवारी (दि.११) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील उभे धानपीक जमीनदोस्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून गेल्या २४ तासात जिल्ह्यातील चार तालुक्यात  अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे धानपीक भुईसपाट झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने  शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. बरेच शेतकरी हलक्या धानाची कापणी आणि मळणी दिवाळीपूर्वी करून दिवाळी सण साजरा करतात. पण, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला मोठ्या प्रमाणात बसला. मंगळवारी (दि.११) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील उभे धानपीक जमीनदोस्त झाले. तर बांध्यामध्ये पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर पावसामुळे शेतकऱ्यांना हाती आलेला पीक गमावण्याची वेळ आली आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाचा अंदाज घेता शेतकऱ्यांनी पुढील चार-पाच दिवस हलक्या धानाची कापणी करून नये, असा सल्ला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. दरम्यान परतीच्या पावसाने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. 

नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

आठपैकी चार तालुक्यात अतिवृष्टी जिल्ह्यात मागील २४ तासात आठपैकी चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून एकूण ५१.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यात ७५.५ मीमी, आमगाव ७१.८ मीमी, तिरोडा ९४.२ मीमी आणि गोरेगाव तालुक्यात ६५.१ मीमी पावसाची नोंद झाली आहे. 

हजारो हेक्टरमधील पिके झाली बाधित - जिल्ह्यात यंदा १ लाख ७६ हजार हेक्टरमध्ये धानाची लागवड करण्यात आली असून सध्या हलक्या धानाची कापणी सुरू आहे. तर जड धानाची कापणी पुढील महिन्यापासून सुरू होईल. धानपीक जोमात असताना परतीच्या पावसाने त्यावर पाणी फेरल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. 

ऑक्टोबर महिन्यात प्रथमच अतिवृष्टीची नोंद पावसाळ्याचा कालावधी हा जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. पण यंदा सप्टेंबर महिना लोटूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यातच मागील २४ तासात जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीची नोंद प्रथमच झाली असून परतीचा पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा बरसल्याचे जिल्ह्यातील वयोवृद्धांनी सांगितले. तर पावसाचे संकट कायम असल्याने शेतकऱ्यांना धान पिकांची चिंता सतावत आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती