शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

संकटातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: October 22, 2015 02:47 IST

शेतकरी चहुबाजूंनी संकटात सापडलेला आहे. मात्र चार दिवसांपूर्वी राईस मिलर्सच्या कार्यक्रमासाठी गोंदियात

गोंदिया : शेतकरी चहुबाजूंनी संकटात सापडलेला आहे. मात्र चार दिवसांपूर्वी राईस मिलर्सच्या कार्यक्रमासाठी गोंदियात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी कोणतीही घोषणा केली नाही. उलट बोनसवर विसंबून राहू नका, असे ठणकावले. मात्र उद्योजकांना स्वस्त वीज, मिलिंगच्या दरात वाढ करून वाहतूक दरातही वाढ देण्याचे संकेत दिले. त्यामुळे हे सरकार उद्योजकांचे असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीच, असा सूर मान्यवरांनी ‘लोकमत व्यासपीठा’वरील चर्चेत लावला.सद्यस्थितीत शेतकरी भिषण संकटात उभा आहे. पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव व अवर्षणामुळे शेतपिक घरी येते की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊनही शेतकऱ्यांच्या हिताचे काहीच असे सांगितले नाही. शेतीच्या उत्पादनावर, त्यांच्या किमती व शेतकऱ्यांवर वाढणाऱ्या कर्जाचा बोजावर बोलायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. शेतकऱ्यांकडे असे दुर्लक्ष करणे ही दु:खद बाब आहे. - उषाताई मेंढेअध्यक्ष, जिल्हा परिषदलोकसभा व विधानसभा निवडणुकीत शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दिड पट भाव देऊ असे घोषणापत्रात लिहून भाजपने राज्य व केंद्रात सत्ता मिळविली. परंतु आता हे सरकार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर बोलायलाही तयार नाही. शेतमालाला भाववाढ देणे आवश्यक आहे. तुरीची डाळ २०० रु. किलो आहे. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांना होत आहे. तांदळाच्या जिल्ह्यात येऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक शब्दही न बोलणे ही शोकांतिका आहे.- गंगाधर परशुरामकरजि.प.गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेसराज्य शासनाने गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कागदावर पैसेवारी चांगली दाखविली असली तरी प्रत्यक्षात देवरी तालुक्यातील चिचगड, ककोडीसारख्या भागात जाऊन पाहिले तर खरी परिस्थिती दिसते. जिल्ह्याला एक मंत्री लाभलेले असतानाही शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारला कळत नाही. हे सरकार उद्योगपतींचेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन केवळ उद्योजकांचाच फायदा पाहिला आहे.- सहेसराम कोरोटेजिल्हा महामंत्री, काँग्रेसउद्योजकांना तुपाशी ठेऊन शेतकऱ्यांना उपाशी ठेवणाऱ्या सरकारचे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही. या सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही. नवीन योजना आणल्या नाही. सगळीकडे दुष्काळ असताना जिल्ह्यात मुख्यमंत्री येऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासंबधात न बोलणे ही बाब मनाला खटकणारी आहे. शेतकऱ्यांचा वापर फक्त मतांसाठी केला जातो. धनीराम भाजीपालेआदर्श शेतकरी, झिलमिली नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या४ अंगावर कर्जाचा डोंगर, त्यातच यावर्षी अवर्षणाचा फटका बसल्याने हातात येणाऱ्या अल्प पिकातून उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न असताना कर्ज फेडणे शक्यच नाही, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने बुधवारच्या सकाळी ७.३० वाजता शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हेमराज टेंभरे (३८) रा.नोनीटोला असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.