शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

मते मागणाऱ्यांना शेतकऱ्यांचा विसर

By admin | Updated: February 3, 2016 01:58 IST

जिल्ह्यात रस्ते करा, पर्यटनाला चालना द्या, आम्ही त्याचे स्वागतच करतो, पण मागील लोकसभा व विधानसभा ...

राष्ट्रवादीची टीका : आता त्यांची बोलती बंदगोंदिया : जिल्ह्यात रस्ते करा, पर्यटनाला चालना द्या, आम्ही त्याचे स्वागतच करतो, पण मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी सातत्याने शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्हीच तुमचे कैवारी आहोत. उत्पादन खर्चाच्या दीड पट तुम्हाला भाव मिळालाच पाहिजे. राज्यात एक आत्महत्या जर झाली तर तत्कालीन सरकारच्या प्रमुखावर ३०२ चा गुन्हा दाखल करा, या प्रकारचा विषारी प्रचार करून राज्यात आणि केंद्रात सरकार स्थापन करणाऱ्यांना आता मात्र शेतकऱ्यांचा विसर पडला, अशी टीका जि.प. सदस्य आणि राष्ट्रवादीचे गटनेते गंगाराम परशुरामकर यांनी केली आहे.त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार, जिल्ह्याच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकाकडे वळण्याचा सल्ला देऊन उत्पादन खर्चावर दीडपट आधारित भाव देण्याच्या बाबतीत बोलणेच बंद केलेत. याचा परिणाम असा झाला की राज्यात व केंद्रात तुमची सत्ता आली असताना या एक वर्षात ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार येण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांना जयश्रीराम सारख्या धानाला २,५०० रूपयांवर भाव मिळत होता, आता तो १,८०० रूपयांना विकत नाही. हा सरकारच्या शेतकरी विरोधी नितीचा परिणाम आहे. यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी तुम्हाला माफ करणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सुमारे आठ हजार कोटी रूपयांच्या खर्चाच्या रस्ते बांधकामाच्या भूमिपूजनाला भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावर आले असताना शेतकऱ्यांना त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना पीक पध्दतीत बदल व पीकविमा यावर भाष्य करून निवडणूकपूर्व काळात केलेल्या घोषणा, दिलेली भाषणे व जाहीरनाम्यात उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे दिलेल्या आश्वासनावर त्यांनी एक शब्दही न बोलता शेतकऱ्यांच्या तोंडाला एकंदरीत पानेच पुसली. जेव्हा शेतकऱ्यांना आपण उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देवू शकत नव्हतो तर तशा प्रकारच्या पोकळ घोषणा करणे योग्य नव्हते. निवडणूकपूर्व काळात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातीलच एका नेत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस घेत नाहीत म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला होता. तर दुसरे एक नेते हे तर उटसुट डोक्याला फेटा बांधून राष्ट्रीय महामार्ग कोहमारा येथे शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन करीत असत. पण आता कुणीही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत नाही.जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी नुकतीच सडक-अर्जुनी येथे आढावा बैठक घेतली. त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आढावा बैठकीत धानाच्या पेंढ्या आणून दाखविल्या. पोटतिडकीने व्यथा सांगितल्या तसेच चिचटोला येथील एका कार्यक्रमात त्याच प्रकारची मागणी तेथील प्रतिष्ठीत नागरिकांनी केली. पण पालकमंत्री दोन्ही कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बाबतीत एक शब्दही बोलले नाहीत, ही एक शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत तत्कालीन राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलेल्या अनेक योजना या सरकारने बंद केलेल्या आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्याचा मुख्य हेतू ठेवून सुरू करण्यात आलेल्या आत्मा योजनेला (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना) यंदा निधी मिळालेला नाही. यावर्षी जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर जमिनीवर घेण्यात येणाऱ्या जयश्रीराम व एचएमटी सारख्या धानाचे उत्पादन झाले नाही तरी एकेकाळी आकांडतांडव करणारी व आता सत्तेत असलेली सर्व मंडळी गप्प आहे. गरीब लोकांच्या जेवनातील दाळ ही १५० ते २०० रूपयांनी विकली जात आहे. यावरून केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. म्हणून या परिसरातील शेतकरीसुध्दा आत्महत्येकडे वळण्याची भिती परशुरामकर यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)