शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

पाखड धान खरेदी केंद्रावरुन बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

शेतकरी बांधव खरीप हंगामातील हलक्या धानाची दिवाळीपूर्वी कापणी आणि मळणी करुन विक्री करतात. यामुळे शेतकºयांना दिवाळी सण साजरा करण्यास मदत होते. सुदैवाने यंदा धान पिकांसाठी अनुकुल असा पाऊस झाल्याने धानपीक चांगले आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सुध्दा यंदा चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा होती.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची कोंडी : फेडरेशन म्हणते शासनाचे आदेश नाही, परतीच्या पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका धान पिकांना बसला. परिणामी मोठ्या प्रमाणात धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड झाला. शेतकरी धानाची मळणी करुन तो धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेत आहेत. पण पाखड धान खरेदी करण्याचे आदेश नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जात आहे.त्यामुळे पाखड धान खरेदी केंद्रावरुन बाद झाल्याने शेतकºयांची कोंडी झाल्याचे चित्र आहे.शेतकरी बांधव खरीप हंगामातील हलक्या धानाची दिवाळीपूर्वी कापणी आणि मळणी करुन विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करण्यास मदत होते. सुदैवाने यंदा धान पिकांसाठी अनुकुल असा पाऊस झाल्याने धानपीक चांगले आले होते. त्यामुळे शेतकºयांना सुध्दा यंदा चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा होती. मात्र या अपेक्षेवर आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने पूर्णपणे पाणी फेरले. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची कापणी केली होती. कापणी केलेला धान बांध्यामध्ये पडून होता.याच दरम्यान परतीचा पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात धानाच्या कडपा भिजल्या.काही शेतकऱ्यांचे धान दोन तीन दिवस पाण्यात पडून राहिल्याने धानाला अंकुर फुटले तर काही धान पाखड झाले. त्यामुळे शेतकºयांनी धान खरेदी केंद्रावर पाखड झालेला धान खरेदी करण्याची सुट देण्याची मागणी शासनाकडे केली होती. शासन यावर नक्कीच काही तरी तोडगा काढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आता जेव्हा शेतकरी पाखड धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेत आहेत. तेव्हा तो धान खरेदी करण्यास नकार दिला जात आहे.त्यामुळे शेतकºयांना धानाची विक्री न करताच परतावे लागत आहे. यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पाखड धान खरेदी करु नये असे निर्देश असल्याने खरेदी करता येत नसल्याचे सांगितले.जिल्हा परिषदेने पाठविला ठरावजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी (दि.१४) पार पडली. यासभेत जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला आहे.त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड झालेला धान खरेदी करण्यात यावा. असा ठराव पारीत करुन तो शासनाकडे पाठविण्याची मागणी केली.याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. तसेच ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सभेला स्थायी समितीचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुध्दा उपस्थित होते.गोदामांचा प्रश्न कायमजिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते.मात्र खरेदी केलेला धान साठवणुकीसाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था करण्यात आली नाही.त्यामुळे गोदामांचा प्रश्न कायम आहे.हा प्रश्न सुध्दा मार्गी लावण्याची मागणी केली आहे.२५ हजार क्विंटल धान खरेदीजिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे मागील आठ दिवसांपासून एकूण ६२ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदीला सुरूवात केली आहे. या सर्व धान खरेदी केंद्रावरुन आत्तापर्यंत २५ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली असल्याचे फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती