शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे होतोेय कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणी केले जातात. शिवाय कोरोना बाधित रुग्णाचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपीड अँटीजेन चाचण्या होत आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तर १ ते ६ सप्टेंबर दरम्यान तब्बल ८२१ कोरोना बाधित आढळले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणाचे सध्याचे नियोजन मात्र, कमी पडत आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा बिनधास्त : हायरिस्कच्या व्यक्तींविषयी आवश्यक काळजीकडे दुर्लक्ष, कोरोना संक्रमणात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांचे स्वॅब नमुने घेवून तपासणी करण्याकडे आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढ होत असून सातत्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जर वेळीच केले तर बऱ्याच प्रमाणात कोरोनाला प्रतिबंध लावण्यात यश येवू शकते.कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणी केले जातात. शिवाय कोरोना बाधित रुग्णाचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपीड अँटीजेन चाचण्या होत आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तर १ ते ६ सप्टेंबर दरम्यान तब्बल ८२१ कोरोना बाधित आढळले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणाचे सध्याचे नियोजन मात्र, कमी पडत आहे. त्याला अपुरे मनुष्यबळ व आरोग्य यंत्रणेवर दोन महिन्यात वाढलेला ताण हे कारण असले तरी कोरोना संसर्ग काळात या बाबी लक्षात घेता, यात दिरंगाई करुनही चालणार नाही. सर्व आजारांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक वेगाने होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेवढ्याच जलद गतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. यासाठी अंमलबजावणी यंत्रणांमध्ये समन्वय असावा. ज्या भागात रुग्णांची नोंद झाली त्या भागातील आरोग्य केंद्राद्वारे त्वरित उपाययोजना होणे, हायरिस्क रुग्णांशी संवाद साधून त्यांना स्वॅब देण्यासाठी पाठविणे, प्रसंगी केंद्रावर घेवून जाणे महत्वाचे आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेत समन्वय असणे महत्त्वाचे आहे. मात्र जिल्ह्यातील सध्या स्थिती पाहता त्याचा अभाव आहे.तपासणी पथके गठीत करुन मोकळेकोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने १५० वर विशेष तपासणी पथके तयार करुन त्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. मात्र यापैकी किती पथके नियमित जावून नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. यावर सुध्दा प्रश्न चिन्ह आहे.अनेकजण टाळतात टेस्ट?कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट कराव्या असे बंधन आहे. खासगी कार्यालये, प्रतिष्ठानांमधील अनेकांनी मात्र या टेस्टला बगल दिली. अशा व्यक्ती कोरोनाचा प्रसार करु शकतात. त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याची तरतूद आहे. मात्र प्रशासन कठोर कारवाई करीत नसल्यामुळे असे अनेक कोरोना वाहक शहरात,जिल्ह्यात फिरत आहेत. याला आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार देखील काही प्रमाणात कारणीभूत आहे.रुग्णांबाबत यंत्रणा बेफिकीरजिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने गंभीर नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांना गृह विलगिकरणात ठेवले जात आहे. या रुग्णांना १८ दिवस सक्तीने एकाच खोलीत राहावे लागते. या रुग्णांचा खोलीचा दरवाजा सील करावा. त्यांच्या घराला याविषयीचे बोर्ड लावावे. यासह अन्य महत्वाचे निर्देश आहेत. मात्र अशा संक्रमित व्यक्तींच्या घराला बोर्ड लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या रुग्णांविषयी परिसरातील नागरिक अनभिज्ञ आहेत. होम विलगिकरणातील पॉझिटिव्ह रुग्ण चक्क बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या