शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:00 AM

जिल्ह्यात कोरोना बाधित २ रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हावासीयांना सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना त्या बोलत होत्या. यांतर्गत, जिल्ह्यात सक्रीय कोरोना बाधित रूग्ण ५२ असून दुर्दैवाने २ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत त्यांनी,२ रूग्णांच्या मृत्यू मागची कारणे शोधली असता ते दोन्ही रूग्ण ६० वर्षांवरील होते. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते व त्यांनी उपचाराला उशीर केला.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे। जिल्हावासीयांना दिली उपाययोजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. या काळात प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.जिल्ह्यात कोरोना बाधित २ रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हावासीयांना सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना त्या बोलत होत्या. यांतर्गत, जिल्ह्यात सक्रीय कोरोना बाधित रूग्ण ५२ असून दुर्दैवाने २ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत त्यांनी,२ रूग्णांच्या मृत्यू मागची कारणे शोधली असता ते दोन्ही रूग्ण ६० वर्षांवरील होते. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते व त्यांनी उपचाराला उशीर केला. जर कुणाला काही आरोग्यविषयक तक्रारी असतील तसेच कोरोनाशी संबंधित काही लक्षणे दिसत असतील तर त्यांनी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच कोरोनासाठी असलेल्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. आरोग्य तपासणी करण्यास व संपर्क करण्यास कोणत्याही प्रकारे विलंब करू नये असे सांगीतले.तसेच कोरोना बाधित रूग्णांमध्ये जिल्ह्यात लहान मुले देखील बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या संसर्ग काळात लहान बालकांना खेळण्यासाठी बाहेर इतरत्र पाठवू नये. १० वर्षांच्या आतील सर्व बालके आणि ६० वर्षांवरील व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाची संसर्ग साखळी तोडावी लागणार आहे. ही संसर्ग साखळी इथेच तोडली नाही तर भविष्यात वेगाने कोरोनाचा फैलाव होणार आहे. जिल्ह्यात बाधित रूग्णांपैकी १ जो बाधित रूग्ण आढळून आला आहे त्याच्या संपर्कातील व्यक्तींपैकी ३७ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहे.अद्यापही १९० व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांचा चाचणी अहवाल प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील व्यक्तीला कोरोनाची बाधा पोहोचू नये यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे.जिल्ह्याला कोरोनावर मात करायची असेल तर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे सहकार्य व त्यांची सकारात्मक भूमिका आवश्यक असून नागरिकांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी कळविले.नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईयाप्रसंगी डॉ. बलकवडे यांनी, ४ जुलैपासून एक विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू केली असून जे व्यक्ती चेहरा व नाकावर मास्क किंवा रूमाल बांधणार नाही. तसेच एखाद्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करतील अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडताना चेहरा व नाकावर मास्क किंवा रूमाल वापरावा, गर्दी करू नये आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये असेही सांगीतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी