शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

राखीव जागेवर केले गावकऱ्यांनी अतिक्रमण

By admin | Updated: December 13, 2014 22:42 IST

शहर असो किंवा एखादे गाव मोकळी जागा दिसल्यास त्यावर अतिक्रमण केले जाते. असाच प्रकार जवळील ग्राम डुंडा येथील राखीव जागेवर काही गावकऱ्यांकडून केला जात आहे. गावातील मोकळ््या जागेवर

पांढरी : शहर असो किंवा एखादे गाव मोकळी जागा दिसल्यास त्यावर अतिक्रमण केले जाते. असाच प्रकार जवळील ग्राम डुंडा येथील राखीव जागेवर काही गावकऱ्यांकडून केला जात आहे. गावातील मोकळ््या जागेवर गावकऱ्यांनी धानाचे पुंजणे तयार केले आहे. यामुळे गावच्या त्या या जागेवर घाण होत असून गावचे वातावरणात प्रदूषित होत आहे. यावर ग्रामपंचायतने अतिक्रमण करणाऱ्या त्या व्यक्तींना नोटीस बजावले आहे. तर गावच्या राखीव जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून जागा मोकळी करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
ग्राम डुंडा येथील मुख्य भागातील राखीव जागेचे हे प्रकरण आहे. गवची ही जागा मोकळी असल्याने गावकरी विविध कार्यक्रम व कामानिमित्ताने या जागेचा वापर करतात. मात्र मागील काही दिवसांपासून गावातीलच काहींनी या मोकळ््या जागेवर धानाचे पुंजणे व खत तयार करण्यासाठी खड्डे खणून अतिक्रमण केले आहे.
या प्रकारामुळे मात्र विविध कामांसाठी वापरण्यात येत असलेल्या या जागेवर घाण होत आहे. शिवाय या घाणीमुळे गावचे वातावरण प्रदुषीत होत आहे.
विशेष म्हणजे या जागेवरच एक विहीर असून त्या विहीरीचे पाणी गावकरी वापरतात. मात्र या घाणीमुळे विहीरीचे पाणीही दुषीत होत असून तेच पाणी गावकऱ्यांना वापरावे लागत असल्याचेही गावकरी बोलत आहेत. एका वर्षापुर्वी अतिक्रमणाचा असाच प्रकार घडला होता व त्यावर ग्राम पंचायत कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली होती. त्याची तक्रार डुग्गीपार पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. मात्र एवढे होऊनही गावकरी काही ऐकण्यास तयार नाहीत व अतिक्रमणाचा प्रकार सुरूच आहे.
गावच्या राखीव जागेवर अतिक्रमण होत असल्याने या प्रकाराला घेऊन गावकऱ्यांत रोष निर्माण आहे. तर या प्रकारावर ग्राम पंचायत कार्यालयाने संबंधीतांना नोटीस बजावले आहे. मात्र जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही.
एकीकडे शासन गावागावांत स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र येथे गावकरीच गावच्या जागेवर अतिक्रमण करून गावात घाण पसरविण्याचा प्रकार करीत आहे. असे असतानाही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने गावकरी आश्चर्य व रोष व्यक्त करीत आहेत. तरी ग्राम पंचायत कार्यालयाने येथील धानाचे पुंजने, तणस, खताचे खड्डे हटवून गावात होत असलेल्या घाणीवर आळा घालावा. तसेच अतिक्रमण व घाण पसरविण्याचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. (वार्ताहर)